AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चिपळूणचा लांडगा, बाटगा अधिक कडवा’… भास्कर जाधवांवर जहरी टीका

उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर कोकणातील भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यातील वाद अधिक उफाळून येण्याची चिन्ह आहेत.

'चिपळूणचा लांडगा, बाटगा अधिक कडवा'... भास्कर जाधवांवर जहरी टीका
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 06, 2023 | 4:32 PM
Share

कृष्णकांत साळगावकर, खेड | ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांनी जहरी टीका केली आहे. भास्कर जाधव यांना त्यांनी चिपळूणचा लांडगा असं संबोधलं आहे. तर वारंवार पक्ष बदलणारे असे ते बाटगे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत बाटगा अधिक कडवा असतो, त्यामुळे त्यांनी शिवसेनेवर बोलू नये, असं रामदास कदम यांनी सुनावलं आहे. उद्धव ठाकरे यांची काल खेड येथे सभा झाली. शिवगर्जना यात्रेदरम्यान आयोजित या सभेत उद्धव ठाकरे यांनी कोकणातील शिवसेना तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर सणकून टीका केली. त्यानंतर आज रामदास कदम यांनी त्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

‘चिपळूणचा लांडगा’

भास्कर जाधवांबद्दल बोलताना रामदास कदम म्हणाले, ‘ हा चिपळूणचा लांडगा आहे. बाटगा अधिक कडवा आहे. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत गेला. पुन्हा शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून पुन्हा शिवसेनेत आला. हा बेईमान बाटगा आता रामदास कदमपेक्षा कडवा निष्ठावान झालाय. हा ऐहसान फरामोश आहे. तुला निवडणूक लढवण्यासाठी टेंपोच्या टेंपा चिपळूणला पाठवले होते. कपडा, साड्या, भगवे झेंडे पाठवले होते. १९९५ ला तुला तिकिट कुणी द्यायला सांगितलं होतं? मी सांगितलं होतं बाळासाहेब ठाकरेंना. त्यावेळी तू जमिनीवर लोटांगण घातलं होतंस.. अशी आठवण रामदास कदम यांनी करून दिली.

नारायण राणे बाहेर गेले तेव्हा…

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची हालत काय झाली होती, यावरून रामदास कदम यांनी जहरी टीका केली. खोक्यांचे आरोप करतायत. पण ज्याला कावीळ असते त्याला दुनिया पिवळी दिसते. एक तरी उदाहरण दाखवा. तुम्ही बाळासाहेबांचे चिरंजीव आहात. पण शिवसेना प्रमुख असते तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का, असा सवाल रामदास कदम यांनी केला. तसेच नारायण राणे शिवसेनेबाहेर गेले तेव्हा त्यावेळी उद्धव ठाकरे मातोश्रीवरून बाहेर निघतच नव्हते. निघाले तरी कुठेही फिरत असताना उद्धव ठाकरे मला गाडीत पुढच्या सीटवर बसवत होते, अशी टीका रामदास कदम यांनी केली.

19 तारखेला उत्तर देणार

रामदास कदम यांनी येत्या १९ तारखेला सभा घेणार असून या सभेत ठाकरेंच्या सर्व आरोपांना उत्तर देणार असल्याचं म्हटलंय. सुरुवात तुम्ही केली. शेवट मी करणार. गुहागर मतदार संघाची जनता तुम्हाला उत्तर देईल, माझ्या नादाला लागू नका, अडचणीत याल. असा इशारा रामदास कदम यांनी दिलाय.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.