AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: मालिका पराभव झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचा संताप, काय चुकलं ते सांगितलं

भारताने इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका 3-0 ने गमावली आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात हा पाचवा पराभव आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. असं असताना इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यरने संताप व्यक्त केला.

IND vs ENG: मालिका पराभव झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचा संताप, काय चुकलं ते सांगितलं
IND vs ENG: मालिका पराभव झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचा संताप, काय चुकलं ते सांगितलंImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jul 10, 2026 | 1:26 AM
Share

भारतीय संघाने आयर्लंडनंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका गमावली आहे. चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 159 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान इंग्लंडने 13.5 षटकात 1 गडी गमवून पूर्ण केलं. या पराभवानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर बोट दाखवलं जात आहे. कारण आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर इंग्लंडविरुद्ध दुसरं अपयश आहे. श्रेयस अय्यरने हातात धुरा घेतल्यापासून पाचवा पराभव झाला आहे. सहा सामन्यात एक सामना पावसामुळे रद्द झाला आणि पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. चौथ्या सामन्यात श्रेयस अय्यरने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी केली. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. श्रेयस अय्यरने 49 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 80 धावा केल्या. पण त्याची खेळी व्यर्थ ठरली. चौथ्या सामन्यातील पराभव आणि मालिका गमावल्यानंतर कर्णधार अय्यरने संताप व्यक्त केलं आहे. इतकंच काय तर या सामन्यात काय चुकलं? याचा पाढा वाचला.

टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी झाली. 158 धावांची धावसंख्या योग्य नव्हती. अखेरीस, त्यांनी किती वेगाने धावांचा पाठलाग केला हे आपण पाहिलेच. जेव्हा आम्ही गोलंदाजीसाठी आलो, तेव्हा मी गोलंदाजांना शक्य तितके चेंडू एकाच टप्प्यावर टाकण्यास सांगितले. मधल्या आणि लेग स्टंपच्या वरच्या भागावर धावा करणे कठीण होते. आमच्या अंमलबजावणीत आम्ही कमी पडलो. मी माझ्या कामगिरीवर नक्कीच आनंदी आहे, पण जर ती विजयासाठी नसेल तर… हा एक स्थित्यंतराचा टप्पा आहे आणि आमच्याकडून चुका होणारच. परिस्थितीशी जुळवून घेणे किती महत्त्वाचे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मला खात्री आहे की संघात लवकर शिकणारे खेळाडू आहेत आणि ते स्वतःचे मूल्यांकन करतील.’

मालिका पराभवामुळे भारताच्या रेकॉर्डवर डाग

  • सध्याच्या दोन मालिकांपूर्वी भारताने त्यांच्या शेवटच्या 12 द्विपक्षीय टी20 आंतरराष्ट्रीय मालिकांपैकी 11 मालिका जिंकल्या होत्या. तर डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेली मालिका 1-1 अशी अनिर्णित राहिली होती. पण आता आयर्लंडनंतर इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका भारताने गमावली आहे.
  • दोन किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या द्विपक्षीय टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत इंग्लंडने भारताचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वीच्या सहापैकी पाच मालिका भारताने जिंकल्या होत्या, तर एक मालिका बरोबरीत सुटली होती.
  • इंग्लंडविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत भारताचा मागील दोन वेळा झालेला पराभव 2018 च्या दौऱ्यात झाला होता तेव्हा एकदिवसीय मालिकेत 2-1 आणि कसोटी मालिकेत 4-1 असा पराभव झाला होता. त्यानंतर मालिकेपूर्वी भारताने 10 पैकी आठ मालिका जिंकल्या होत्या. तर इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या मागील दोन कसोटी मालिका अनिर्णित 2-2 अशा बरोबरीत सुटल्या होत्या.
Follow Us
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने