AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी लाटेतही पंजाबमधील काँग्रेसचा किल्ला सुरक्षित राहण्याची कारणे काय?

चंदिगड : लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतात काँग्रेसचा किल्ला सुरक्षित ठेवणारे पंजाब एकमेव राज्य ठरले. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राज्यात काँग्रेसला 13 लोकसभा जागांपैकी 8 जागांवर विजय मिळवून दिला. पंजाबमध्ये भाजपला 2, शिरोमणि अकाली दलाला (SAD) 2 आणि आम आदमी पक्षाला (AAP) एका जागेवर विजय मिळाला. विशेष म्हणजे भाजपच्या घराणेशाहीच्या प्रचारानंतरही मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या […]

मोदी लाटेतही पंजाबमधील काँग्रेसचा किल्ला सुरक्षित राहण्याची कारणे काय?
| Updated on: May 26, 2019 | 6:21 PM
Share

चंदि: लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतात काँग्रेसचा किल्ला सुरक्षित ठेवणारे पंजाब एकमेव राज्य ठरले. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राज्यात काँग्रेसला 13 लोकसभा जागांपैकी 8 जागांवर विजय मिळवून दिला. पंजाबमध्ये भाजपला 2, शिरोमणि अकाली दलाला (SAD) 2 आणि आम आदमी पक्षाला (AAP) एका जागेवर विजय मिळाला.

विशेष म्हणजे भाजपच्या घराणेशाहीच्या प्रचारानंतरही मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या पत्नी प्रिनीत कौर पटियालातून चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. प्रिनीत कौर यांनी शिरोमणी अकाली दल–भाजपचे उमेदवार सुरजीत सिंग यांचा 1 लाख 62 हजार 718 मतांनी पराभव केला.

मोदींच्या राष्ट्रवादाच्या रणनीतीचा मुकाबला कसा केला?

कॅप्टन अमरिंदर यांनी आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करण्याच्या स्पष्ट सुचना दिल्या होत्या. तसेच उमेदवारांच्या प्रचारात कमी पडल्यास त्याचा परिणाम संबंधित मंत्र्यांच्या मंत्रीपदावर पडू शकतो, असाही इशारा अमरिंदर सिंग यांनी दिला होता. अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या अजेंड्याचा सामनाही ताकदीने केला. त्यासाठी त्यांनी आपल्या सैन्यातील पार्श्वभूमीचा उपयोग केला. त्यात त्यांना यशही आल्याचे राजकीय विश्लेषक मानतात.

भाजप-शिअद सरकारच्या काळात 2015 मध्ये बेहबल कला आणि कोटकपुरा येथे गोळीबार झाला होता. त्यातील मृतांच्या स्मरणार्थ स्मृतीस्थळाच्या आश्वासनानेही भाजप-शिअदवर नकारात्मक परिणाम केला. 2015 मध्ये बेहबल कला आणि कोटकपुरा येथे झालेल्या गोळीबाराची घटना भाजप शिअदची मोठी चूक होती. त्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्याचा परिणाम भाजप-शिअदला या निवडणुकीत भोगावा लागला, असे मत राजकीय विश्लेषकांनीही व्यक्त केले आहे.

दुसरीकडे अमरिंदर सिंग यांनी 1984 च्या दंगलीवर सार्वजनिकपणे टीका केल्याने त्यांना याचा फायदा झाल्याचेही बोलले जात आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.