AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी लाटेतही पंजाबमधील काँग्रेसचा किल्ला सुरक्षित राहण्याची कारणे काय?

चंदिगड : लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतात काँग्रेसचा किल्ला सुरक्षित ठेवणारे पंजाब एकमेव राज्य ठरले. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राज्यात काँग्रेसला 13 लोकसभा जागांपैकी 8 जागांवर विजय मिळवून दिला. पंजाबमध्ये भाजपला 2, शिरोमणि अकाली दलाला (SAD) 2 आणि आम आदमी पक्षाला (AAP) एका जागेवर विजय मिळाला. विशेष म्हणजे भाजपच्या घराणेशाहीच्या प्रचारानंतरही मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या […]

मोदी लाटेतही पंजाबमधील काँग्रेसचा किल्ला सुरक्षित राहण्याची कारणे काय?
| Updated on: May 26, 2019 | 6:21 PM
Share

चंदि: लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतात काँग्रेसचा किल्ला सुरक्षित ठेवणारे पंजाब एकमेव राज्य ठरले. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राज्यात काँग्रेसला 13 लोकसभा जागांपैकी 8 जागांवर विजय मिळवून दिला. पंजाबमध्ये भाजपला 2, शिरोमणि अकाली दलाला (SAD) 2 आणि आम आदमी पक्षाला (AAP) एका जागेवर विजय मिळाला.

विशेष म्हणजे भाजपच्या घराणेशाहीच्या प्रचारानंतरही मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या पत्नी प्रिनीत कौर पटियालातून चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. प्रिनीत कौर यांनी शिरोमणी अकाली दल–भाजपचे उमेदवार सुरजीत सिंग यांचा 1 लाख 62 हजार 718 मतांनी पराभव केला.

मोदींच्या राष्ट्रवादाच्या रणनीतीचा मुकाबला कसा केला?

कॅप्टन अमरिंदर यांनी आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करण्याच्या स्पष्ट सुचना दिल्या होत्या. तसेच उमेदवारांच्या प्रचारात कमी पडल्यास त्याचा परिणाम संबंधित मंत्र्यांच्या मंत्रीपदावर पडू शकतो, असाही इशारा अमरिंदर सिंग यांनी दिला होता. अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या अजेंड्याचा सामनाही ताकदीने केला. त्यासाठी त्यांनी आपल्या सैन्यातील पार्श्वभूमीचा उपयोग केला. त्यात त्यांना यशही आल्याचे राजकीय विश्लेषक मानतात.

भाजप-शिअद सरकारच्या काळात 2015 मध्ये बेहबल कला आणि कोटकपुरा येथे गोळीबार झाला होता. त्यातील मृतांच्या स्मरणार्थ स्मृतीस्थळाच्या आश्वासनानेही भाजप-शिअदवर नकारात्मक परिणाम केला. 2015 मध्ये बेहबल कला आणि कोटकपुरा येथे झालेल्या गोळीबाराची घटना भाजप शिअदची मोठी चूक होती. त्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्याचा परिणाम भाजप-शिअदला या निवडणुकीत भोगावा लागला, असे मत राजकीय विश्लेषकांनीही व्यक्त केले आहे.

दुसरीकडे अमरिंदर सिंग यांनी 1984 च्या दंगलीवर सार्वजनिकपणे टीका केल्याने त्यांना याचा फायदा झाल्याचेही बोलले जात आहे.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...