AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shambhuraj Desai : मंत्री असताना महाराष्ट्रात किती फिरत होता?; शंभुराज देसाई यांचं आदित्य ठाकरेंना सवाल

Shambhuraj Desai : सत्ता गेली. निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेनेचे 40 आमदार हे शिंदेंच्या नेतृत्वात एकवटले आहेत. हे पाहिल्यावर तुम्ही राज्यात फिरत आहात. हे चांगलं लक्षण आहे. या निमित्ताने तुमचं दर्शन होतंय. सामान्य माणसांना भेटत आहात.

Shambhuraj Desai : मंत्री असताना महाराष्ट्रात किती फिरत होता?; शंभुराज देसाई यांचं आदित्य ठाकरेंना सवाल
मंत्री असताना महाराष्ट्रात किती फिरत होता?; शंभुराज देसाई यांचं आदित्य ठाकरेंना सवालImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 07, 2022 | 11:57 AM
Share

सातारा: मैत्रीदिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोबत येण्याचं आवाहन आवाहन केलं जात आहे. सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी मैत्रीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. तर, दुसरे बंडखोर आमदार शंभुराज देसाई (shambhuraj desai) यांनीही उद्धव ठाकरे यांना हेच आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरेंना सांगतो, आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयी यांचे विचार घेऊन युतीचे सरकार चालवत आहोत. त्याला मैत्री दिनानिमित्त शुभेच्छा, आशीर्वाद देऊन सोबत पुढे यावे, असे आवहान शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंनी (aaditya thackeray) तुम्ही मंत्री असताना महाराष्ट्रात किती फिरत होता?, असा सवालच शंभुराज देसाई यांनी केला आहे.

हर घर तिरंगाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. आज नीती आयोगाची बैठक आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना जावं लागत आहे. महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात भागतही मुख्यमंत्र्यांचे दौरे चालले आहेत. या दौऱ्यांवरही आदित्य ठाकरे यांनी कटाक्ष टाकावा. सरकारी कामकाजानिमित्त मुख्यमंत्री दिल्लीला जात आहेत. तेवढ्यावर टीका करू नका. आज तुमचं सरकार गेलं म्हणून तुम्ही राज्यात दौरे करत आहात. मंत्री असताना तुम्ही किती दौरे केले त्याकडे पहिलं लक्ष द्या, असा हल्लाबोल शंभुराज देसाई यांनी केला आहे.

सोयीस्कर टीका करू नका

सत्ता गेली. निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेनेचे 40 आमदार हे शिंदेंच्या नेतृत्वात एकवटले आहेत. हे पाहिल्यावर तुम्ही राज्यात फिरत आहात. हे चांगलं लक्षण आहे. या निमित्ताने तुमचं दर्शन होतंय. सामान्य माणसांना भेटत आहात. या निमित्ताने मातोश्रीची दारे सामान्य माणसाला उघडी झाली. त्यामुळे यावर आम्हाला काही म्हणायचे नाही. पण शिंदेंना ग्रामीण भागातील लोंढेच्या लोंढे भेटत आहेत. शिंदे हे गडचिरोली, नागपूर, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत फिरत आहेत. त्याकडे लक्ष द्या. तिकडे लक्ष द्यायचे नाही आणि सोयीस्कररित्या दिल्ली दौऱ्यावरून टीका करायची हे चुकीचं आहे, अशी टीकाही त्यांनी आदित्य ठाकरेंवर केली.

दंगली घडवण्याचा विषय जाणीवपूर्वक

शिवसेना भाजपच्या नैसर्गिक युतीचं हे सरकार आहे. हे सरकार आल्यापासून ज्यांना हे रूचले नाही, पचले नाही, जे स्वीकारायाल तयार नाहीत, ते लोक पहिल्या दिवसापासून युती सरकारवर टीका करत आहेत. दंगली घडवण्याचा विषय त्यांच्याकडून जाणीवपूर्वक केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हल्ला करणाऱ्यांच्या हातात शिवबंधन

उदय सामंत यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतलं आहे. ते कोणत्या पक्षाचे आहेत. त्यांच्या हातात शिवबंधन होतं. दोन पक्ष आणि विचारात भांडणं लावून महाराष्ट्रातील वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेच लोक कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा दावा करत आहेत. ते चुकीचं आहे. कुणाचा दंगली घडवण्याचा कुणाचा मानस असेल तर शिंदे- फडणवीस त्याची गंभीर दखल घेतील, असंही ते म्हणाले.

आमदार, खासदारांनी तुमचं नेतृत्व का सोडलं?

आम्हाला आदित्य ठाकरे यांनी गद्दार म्हणण्याआधी तुमचे आमदार आणि खासदार तुमच्या नेतृत्वापासून दूर का गेले? हे पहावे. त्यामुळे आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असून शिवसेना वाचविण्याचे काम केले आहे. आदित्य ठाकरे हे नव्यानेच राजकारणात आलेले आहेत. ज्या काळात शिवसेना हे नाव उचारल्यास कारवाई होत होती. अशा काळात आम्ही शिवसेना उभी केली, असा टोलाही त्यांनी लगावला.

Follow Us
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; सिब्बलांचा कोर्टात दावा
Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर..
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती...
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
अखेर भेटूही दिलं नाही अन्... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?