AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना घाबरतात?; रोहित पवार यांचा खोचक सवाल

महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर गेलेत यावर चर्चा व्हायला पाहिजे. पण त्याचवेळी टिकलीचा विषय येतो. कुठला तरी नेता खालच्या भाषेत बोलतो. हे षडयंत्र आहे का?

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना घाबरतात?; रोहित पवार यांचा खोचक सवाल
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना घाबरतात?; रोहित पवार यांचा खोचक सवालImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 20, 2022 | 11:54 AM
Share

पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक विधान केल्यानंतर विरोधकांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला या मुद्द्यावरून विरोधकांनी सवाल विचारण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना घाबरत आहेत का? असा सवालच रोहित पवार यांनी केला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हटवा. ही व्यक्ती महाराष्ट्राला न शोभणारी आहे. एवढे दिवस ही व्यक्ती महाराष्ट्रात कशी काय राज्यपाल म्हणून राहते? त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर काही बोलत नाही. ते राज्यपालांना घाबरतात का? त्याबद्दल माहीत नाही, असं रोहित पवार म्हणाले.

हे लोक राज्यपालांना घाबरतात की नाही माहीत नाही. पण महाराष्ट्र कधीही घाबरणार नाही. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिपाठीनं घाणेरडं वक्तव्य केलं. यांच्या पाठीशी नक्की कोण आहे? सत्तेत असलेली लोकं काही बोलत नाहीत. सावरकरांवर बोलायला पुढे आले. मात्र आज कुठे दिसत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

शिवाजी महाराजांच्या विरोधात कोणी बोलत असेल आपण शांत कसं बसणार? ती आपली अस्मिता आहे इतिहास आहे. शिवाजी महाराज नसते तर आपली परिस्थिती बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षाही विचित्र झाली असती. या राज्याला वैचारिक बैठक आहे ती मलीन करण्याचा प्रयत्न होतो आहे. याला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे, असं ते म्हणाले.

महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर गेलेत यावर चर्चा व्हायला पाहिजे. पण त्याचवेळी टिकलीचा विषय येतो. कुठला तरी नेता खालच्या भाषेत बोलतो. हे षडयंत्र आहे का? काही लोकं यासाठीच काम करतात, अशी टीका त्यांनी केली.

राहुल गांधींची यात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली तेव्हा तिला चांगला प्रतिसाद मिळाला. दक्षिणेत कोणीही त्यांची यात्रा दाखवली नाही. मात्र महाराष्ट्रात पत्रकारिता जिवंत आहे. माध्यमात मोठा बदल होतोय, असं ते म्हणाले.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.