AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युतीच्या 235-240 जागा येतील, त्यात आमचेही 4-5 आमदार असतील : आठवले

मुंबईतील वरळी येथे आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्याला (RPI Melava Ramdas Athavle) मुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांची उपस्थिती होती. या निवडणुकीत युती व्हावी अशी आपली इच्छा असल्याचं रामदास आठवले म्हणाले.

युतीच्या 235-240 जागा येतील, त्यात आमचेही 4-5 आमदार असतील : आठवले
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Sep 05, 2019 | 9:55 PM
Share

मुंबई : शिवसेना आणि भाजप एकत्र लढले तर राज्यात 288 पैकी 235 ते 240 जागा येतील. त्यामध्ये आरपीआयचेही चार ते पाच आमदार असतील, असं वक्तव्य आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (RPI Melava Ramdas Athavle) यांनी केलं. मुंबईतील वरळी येथे आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्याला (RPI Melava Ramdas Athavle) मुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांची उपस्थिती होती. या निवडणुकीत युती व्हावी अशी आपली इच्छा असल्याचं रामदास आठवले म्हणाले.

शिवसेना आणि भाजप यांच्यातच अजून जागांचं वाटप झालेलं नाही. पण मित्रपक्षांना सन्मानपूर्वक जागा मिळतील, अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी 57 जागा मागितल्या. हरकत नाही जागा मागायला.. पण माहीत आहे तेवढया पण जागा मिळणार नाही, असंही आठवले म्हणाले.

शिवसेना आणि भाजपने एकत्र यावं ही माझी इच्छा आहे, असं रामदास आठवलेंनी मुख्यमंत्र्यांसमोर सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मला जवळ पाहायचंय. हे एकत्र आले तर 235 ते 240 जागा येतील आणि त्यात आमच्याही 4 ते 5 जागा असतील, असं आठवले म्हणाले.

यावेळी विधानसभेत आरपीआयचेही आमदार असतील : मुख्यमंत्री

पुन्हा एकदा राज्यात युतीचीच सत्ता येणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. महायुतीचं सरकार येणार याचा विश्वास आहे आणि यावेळी विधानसभेत आरपीआयचेही आमदार असतील याबाबत तुम्हाला आश्वस्त करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारवरही टीका केली. आघाडीच्या सरकारच्या काळात सुईएवढी जागा देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दिली नाही. इंदू मिलच्या जागेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसात जमिनीचा प्रश्न निकाली काढला, असं मुख्यमंत्री म्हणाले.

निवडणूक जवळ आली की काही पक्ष भाजप संविधान बदलणार असं सांगतात. पण त्यांना सांगावंसं वाटतं की ही रेकॉर्ड आता जुनी झाली. मोदी कुणाच्या फोटोला नाही, तर संविधानाला नमन करुन कामाची सुरुवात करतात. आमची संविधानावर श्रद्धा आहे, त्यामुळे त्यालाच कुराण आणि बायबल समजून काम करु. भारतात आरक्षण कुणीही संपवणार नाही ही काळ्या दगडावरील रेघ आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 काढल्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 370 ला विरोध करत संविधान सभेतून वॉक आऊट केलं होतं. 70 वर्षांनी हे कलम रद्द झालं. त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलेला निर्णय आज झाला आणि त्यांच्या विरोधाला न्याय मिळाला, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचं कौतुक केलं.

VIDEO : मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण भाषण

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट