AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरिबांना वार्षिक 72 हजार रुपये देऊ, राहुल गांधींची मोठी घोषणा

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली. देशात काँग्रेसची सत्ता आल्यास 20 टक्के गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देऊ, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. राजधानी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या पाच वर्षात देशातील जनतेने अनेक कष्ट झेलले. मात्र काँग्रेस सत्तेत आल्यास प्रत्येकाला न्याय मिळेल, असं […]

गरिबांना वार्षिक 72 हजार रुपये देऊ, राहुल गांधींची मोठी घोषणा
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली. देशात काँग्रेसची सत्ता आल्यास 20 टक्के गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देऊ, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. राजधानी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली.

गेल्या पाच वर्षात देशातील जनतेने अनेक कष्ट झेलले. मात्र काँग्रेस सत्तेत आल्यास प्रत्येकाला न्याय मिळेल, असं राहुल गांधी म्हणाले. देशातील 20 टक्के गरिबांना महिन्याला 6 हजार म्हणजेच वर्षाला 72 हजार रुपये देऊ. न्याय योजना असं या स्कीमचं नाव असेल, असं राहुल गांधी म्हणाले.

किमान वेतन अंतर्गत 25 कोटी गरिबांना या योजनेचा लाभ मिळेल. ज्यांचं उत्पन्न 12 हजारांपेक्षा कमी असेल, त्यांचं उत्पन्न 12 हजार रुपयांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करु. जर तुमचं उत्पन्न 8000 असेल, तर सरकारकडून 4 हजार रुपये मिळतील, असं राहुल गांधींनी सांगितलं.

सध्या मासिक किमान वेतन मर्यादा 12 हजार रुपये आहे. मात्र जर एखाद्या कुटुंबाचं मासिक उत्पन्न 6 हजार रुपये असेल, तर त्यांना आणखी 6 हजार रुपये देऊन त्यांचं उत्पन्न 12 हजारापर्यंत पोहोचवायला हवं, अशी आमची इच्छा आहे, असं राहुल गांधींनी नमूद केलं.

काँग्रेसला 21 व्या शतकात देशातील गरिबी कायमची मिटवायची आहे. त्यामुळे 20 टक्के गरिबांना 6 हजार रुपये मासिक वेतन दिलं जाऊ शकतं, असं राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वात श्रीमंतांना पैसे देऊ शकतात, तर काँग्रेस गरिबांना नक्कीच पैसे देईल, असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं.

राहुल गांधींनी मोदी सरकारने केलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांच्या घोषणेवरही निशाणा साधला. मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिवसाला केवळ 3.5 रुपेय दिले, मात्र खासगी विमान कंपन्यांना कोट्यवधी बहाल केले, असा आरोप यावेळी राहुल गांधींनी केला.

Follow Us
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....