AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाने भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले, या दाहक निष्कर्षाचे काय, सामनातून सवाल

कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांवर वाईट परिणाम झाले आहेत. मात्र, हिंदुस्थानी माणसाचे आयुष्य दोन वर्षांनी घटल्याचा निष्कर्ष सगळ्यात धक्कादायक आहे. कोरोनाने हिंदुस्थानी माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले आहे. या दाहक निष्कर्षाचे काय?, असा प्रश्न आज सामना अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

कोरोनाने भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले, या दाहक निष्कर्षाचे काय, सामनातून सवाल
CORONA
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Oct 25, 2021 | 9:43 AM
Share

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांवर वाईट परिणाम झाले आहेत. मात्र, हिंदुस्थानी माणसाचे आयुष्य दोन वर्षांनी घटल्याचा निष्कर्ष सगळ्यात धक्कादायक आहे. कोरोनाने हिंदुस्थानी माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले आहे. या दाहक निष्कर्षाचे काय?, असा प्रश्न आज सामना अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. लसीकरण वाढले आणि सरासरी आयुष्य घटले हे चित्र काही बरे नाही. 100 कोटी लसीकरणाच्या गाजावाजात घटलेल्या आयुष्याचा आक्रोश विसरुन जाऊ नये, असं यात म्हटलं आहे.

लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेसह सर्वच क्षेत्रांवर अत्यंत वाईट परिणाम

कोरोना महामारीचे दुष्परिणाम संपूर्ण जगच भोगत आहे. मागील दीड वर्षापासून या विषाणूने आपल्या देशातही हाहाकार माजविला आहे. त्यातून वेळोवेळी कराव्या लागलेल्या लॉक डाऊनमुळे अर्थव्यवस्थेसह सर्वच क्षेत्रांवर अत्यंत वाईट परिणाम झाले आहेत. मात्र, कोरोनाचा आणखी एक भयंकर आणि दूरगामी दुष्परिणाम आता समोर आला आहे. या विषाणूने हिंदुस्थानी नागरिकांचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी कमी केले आहे. मुंबईच्या इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज या संस्थेने केलेल्या अभ्यासातून हा भयंकर निष्कर्ष समोर आला आहे.

कोरोनाची लागण झालेल्यांना अनेक प्रकारचे ‘पोस्ट कोविड’ दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. ज्यांना आधीच काही आजार आहेत अशा कोरोना रुग्णांना तर हा त्रास मोठया प्रमाणावर सहन करावा लागत आहे. त्यात आता कोरोनामुळे हिंदुस्थानी नागरिकांचे सरासरी आयुर्मान दोन वर्षांनी घटल्याचा निष्कर्ष निश्चितच धक्कादायक आहे. तीनच दिवसांपूर्वी कोरोना लसीकरणाने देशात 100 कोटींचा टप्पा ओलांडल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. नेहमीच्या पद्धतीने सरकारने हा ‘विक्रम’ विविध पातळ्यावर साजराही केला. पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांशी खास संवाद साधला आणि 100 कोटी लसीकरणाचे यश हे देशाच्या 130 कोटी जनतेचे आहे असे ते म्हणाले. देशभरातील सर्व संबंधित यंत्रणांनी कोरोना लसीकरणासाठी अपार मेहनत घेतली आहे.

हिंदुस्थानी माणसाचे आयुष्य दोन वर्षांनी घटले

अर्थात 100 कोटी लसींचा टप्पा कोरोना लढाईतील एक भाग झाला. इतरही अनेक आव्हाने ही लढाई जिंकण्यासाठी पेलायची आहेत. कारण कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांवर वाईट परिणाम झाले आहेत. मात्र हिंदुस्थानी माणसाचे आयुष्य दोन वर्षांनी घटल्याचा निष्कर्ष सगळ्यात धक्कादायक आहे. कोरोनामुळे ज्या दुर्दैवी जिवांचा मृत्यू झाला, ने तर काही परत येऊ शकणार नाहीत. ज्यांच्या आरोग्यावर काही परिणाम झाले आहेत, ते औषधोपचार आणि इतर उपायांनी सुधारता येतील.

लॉकडाऊन करावे लागल्याने देशाचे आणि व्यक्तिगत पातळीवर लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. लाखो रोजगार बुडाले, औद्योगिक तोटा झाला. हे नुकसानही कालांतराने भरुन निघू शकेल. देशाचा आधीच पसरलेला आर्थिक विकास कोरोनाने पुरता ठप्प केला. हे गाडे रुळावर यायला वेळ लागेल, पण ते येईल अशी आशा करता येईल. कोरोनाच्या सामाजिक, मानसिक परिणामांवरदेखील काळ हेच औषध ठरेल. मात्र देशातील नागरिकांचे घटलेले सरासरी आयुर्मान पुन्हा कसे आणि कधी पूर्ववत होणार? ज्या संस्थेने हा अभ्यास केला आणि निष्कर्ष काढला, त्या संस्थेच्या म्हणण्यानुसार कोरोनापूर्वी आपले सरासरी आयुर्मान 69.5 वर्षे इतके होते. आता ते 67.5 वर्षे झाले आहे. महिलांचे आयुष्यही 72 वर्षावरून 69.8 वर्ष एवढे खाली आले आहे.

थोडक्यात, 2010 मध्ये आपले जे आयुर्मान होते, त्याच ठिकाणी आपण आलो आहोत. म्हणजे देशवासीयांचे सरासरी आयुष्य वाढविण्यासाठी मागील दशकात घेतलेली मेहनत कोरोनाच्या लाटांनी साफ पाण्यात गेली आहे. आता ही घटलेले सरासरी आयुर्मान पुन्हा पूर्वपदावर आणणे आणि नंतर ते वाढविणे हे एक मोठेच आव्हान हिंदुस्थानसमोर असणार आहे. हे उद्दिष्ट पुढील किती वर्षांत साध्य होते ते कोणीच सांगू शकणार नाही. आपल्या देशात कोरोनाचे प्रमाण सध्या कमी झाले असले तरी तो पूर्णपणे नष्ट झालेला नाही. तिसऱ्या लाटेचा धोकाही आहेच, चीन, रशिया आणि अन्य काही देशांत कोरोमाने आता पुन्हा धुमाकूळ घातला आहे. म्हणजे कोरोनाची टांगती तलवार आपल्याही डोक्यावर आणखी काही काळ राहणारच आहे.

लसीकरण हाच त्यावरील प्रभावी उपाय आहे हे खरेच, पण कोरोनाने घटविलेल्या सरासरी आयुर्मानाचाही विचार करावाच लागेल, कोरोना लसीकरणाची ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ जरूर व्हावीत, पण त्याच कोरोनाने हिंदुस्थानी माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले आहे, या दाहक निष्कषचि काय? लसीकरण वाढले आणि सरासरी आयुष्य घटले हे चित्र काही बरे नाही. 100 कोटी लसीकरणाच्या गाजावाजात घटलेल्या आयुष्याचा आक्रोश विसरुन जाऊ नये इतकेच!

संबंधित बातम्या :

“अखंड राष्ट्र करायचं तर स्वागत पण फाळणी करुन तुटलेल्या पाकिस्तानातील 11 कोटी मुसलमानांचे काय करणार? त्यावर मोदींनी बोलावं”

“गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती!”

Follow Us
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय.

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन.

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय?  काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी  म्हणाल्या की...

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय? काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या की..