AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ तीन प्रश्नांवर तोडगा नाही, देश चालतो कसा?; सामनातून ‘रोखठोक’ सवाल

Saamana Editorial on PM Narendra Modi : 'ते' तीन प्रश्न, तोडगा अन् केंद्र सरकारला सवाल; आजच्या सामना अग्रलेखात नेमकं काय?

'या' तीन प्रश्नांवर तोडगा नाही, देश चालतो कसा?; सामनातून 'रोखठोक' सवाल
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 18, 2023 | 7:57 AM
Share

मुंबई : सामनाच्या रविवारच्या रोखठोक या सदरातून सवाल विचारण्यात आलाय. राज्य कसे चालले आहे? याचे उत्तर आज कुणीच देऊ शकत नाही. मणिपूरची आग विझवता येत नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी ट्विटरवर दबाव आणला गेला. राज्यकर्त्यांच्या ‘आरामगिरी’वर कोटयवधी उधळले जात आहेत. चीनने सीमेवर विमानतळ उभे केले, पण राज्य चालवणारे गप्प आहेत!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागातून रोजच्या रोज ज्या तणावाच्या आणि हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत त्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. मणिपूरसारखे राज्य पेटलेलेच आहे. आतापर्यंत शेकडो घरे, गाडय़ा, व्यवसाय भस्मसात झाले व पाचशेच्या आसपास लोक त्या हिंसेत मरण पावले. पंजाब आणि कश्मीरप्रमाणे मणिपूरचा प्रश्न चिघळत चालला आहे व गृहमंत्री अमित शहा निवडणुकांच्या राजकारणात स्वतःला गुंतवून घेत आहेत.

मणिपूरसारख्या लहान राज्यात गृहमंत्री शांतता प्रस्थापित करू शकले नाहीत. मणिपूरमध्ये वर्गकलहाने हिंसाचाराचा उद्रेक झाला व हे राज्य तुटेल असे चित्र आहे. पंतप्रधान मोदी ‘पोन-रशियाच्या युद्धात मध्यस्थी करू शकतात (असे भक्त सांगतात), पण मणिपूरमधील दोन जमातींमधला कलह सोडवू शकत नाहीत. हे चित्र चांगले नाही, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

मोदी-शहांचे राज्य नेमके कसे चालले आहे? याचा खुलासा ‘ट्विटर’चे माजी ‘सीईओ’ जॅक डोर्सी यांनी केला आहे. सरकारविरोधी भूमिकांना ‘ट्विटर’वर स्थान देऊ नका, असा दबाव असल्याचा स्फोट डोर्सी यांनी केला.

भारत सरकारने शेतकरी आंदोलनादरम्यान दबाव आणला होता की, आंदोलनासंदर्भातल्या बातम्या व भूमिकांना स्थान देऊ नका. आमचे ऐकले नाहीत तर भारतातील ‘ट्विटर’ कार्यालय बंद पाडू व तुमच्या कर्मचाऱ्यांवर धाडी घालू.” डोर्सी खोटे बोलत आहेत असा कांगावा आता केंद्राचे एक मंत्री चंद्रशेखर करीत आहेत. जॅक डोर्सी यांना खोटे बोलण्याचे तसे काहीच कारण नाही. पण खोटे बोलावे, सत्य दडपावे यासाठी मोदी सरकारकडे भरपूर कारणे आहेत. या देशाचे सध्याचे राज्यकर्ते किती डरपोक आहेत हे या प्रकरणातून स्पष्ट होते. हुकूमशहा हा डरपोकच असतो. चार गाढवे एकत्र चरत असली की हुकूमशहाला त्या चार गाढवांची भीती वाटू लागते. ही चार गाढवे आपल्या विरोधात काही कारस्थाने तर करीत नसतील ना? या चिंतेने तो अस्वस्थ होतो. आपल्या देशात नेमके तेच सुरू आहे, असं म्हणत जॅक डोर्सी यांच्या वक्तव्यावर रोखठोकमधून भाष्य करण्यात आलं आहे.

Follow Us
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...