AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“रुपया रोजच घसरतोय, देशाची अप्रतिष्ठा होतेय”, अर्थव्यवस्थेवर भाष्य करत सामनातून मोदींवर टीका

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भारतीय अर्थव्यवस्था आणि घसरता रुपया यावर भाष्य करण्यात आलं आहे. वाचा...

रुपया रोजच घसरतोय, देशाची अप्रतिष्ठा होतेय, अर्थव्यवस्थेवर भाष्य करत सामनातून मोदींवर टीका
| Updated on: Oct 08, 2022 | 8:34 AM
Share

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) आणि घसरता रुपया यावर भाष्य करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या काळात रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 67 वरून 68 वर जाऊन पोहोचली त्यावेळी भाजपने संसदेत सरकारवर कडाडून हल्ला चढवला होता. ‘रुपया हा केवळ कागदाचा एक तुकडा नाही, तर त्यावरून देशाची प्रतिष्ठा ठरत असते’, असे विधान भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी त्यावेळी संसदेत केले होते. सुषमा स्वराज यांनी खरे तेच सांगितले होते. आज तर रुपया रोजच कोसळतो आहे आणि जागतिक पातळीवर रोजच देशाची अप्रतिष्ठा होत आहे. ती रोखण्यासाठी सरकार काही करणार आहे काय?”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

आपला देश लवकरच आर्थिक महासत्ता म्हणून ओळखला जाईल, अशा गर्जना केंद्रातील सत्तापक्षाकडून वारंवार केल्या जातात. तसे खरोखरच होणार असेल तर त्याचे स्वागतच आहे. आपण महासत्ता होऊ तेव्हा होऊ, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची जी भयंकर घसरगुंडी सुरू आहे, त्यामुळे देशाची इभ्रत धुळीस मिळते आहे. ही इभ्रत आणि देशाची पत राखण्यासाठी केंद्रीय सरकार काय करते आहे? आर्थिक महासत्तेचे नंतर बघू, तूर्तास कोसळणाऱ्या रुपयाला कसे सावरणार, हे सरकारने देशवासीयांना सांगावे, असा सवालही सामनातून करण्यात आला आहे.

ब्रिटनला मागे टाकून आपण कशी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनतो आहोत व आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने झेप घेत आहोत, असे सुंदर काल्पनिक चित्र सरकारकडून रंगवले जात आहे. तथापि, सरकार पक्षाकडून अर्थव्यवस्थेविषयी केले जाणारे दावे आणि प्रत्यक्षात असलेली अर्थव्यवस्थेची बिकट परिस्थिती यात जमीन अस्मानाचे अंतर धडधडीत दिसत असताना आर्थिक महासत्तेचे स्वप्नरंजन म्हणजे केवळ पोकळ बाता आहेत, असं म्हणत केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनीच मध्यंतरी ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारला जे खडे बोल सुनावले ते देशाच्या अर्थव्यवस्थेची गंभीर स्थिती चव्हाटय़ावर आणणारेच आहेत. 20 कोटी लोक दारिद्रय़रेषेखाली जगत आहेत. 23 कोटी लोकांचे रोजचे उत्पन्न 375 रुपयांहून कमी आहे. बेरोजगारीचा दर 7.6 टक्के झाला आहे, अशी आकडेवारीच होसबाळे यांनी एका कार्यक्रमात मांडली, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.