AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana : सामनाकडून दिपाली सय्यद इग्नोर, मात्र “वासू-सपनाचा संसार, खुर्चीचा प्रेमरोग” म्हणत शिंदे-फडणवीसांवर तुफान फटकेबाजी

सामनातून आज पुन्हा शिंदे आणि फडणवीसांवर तुफान फटकेबाजी करण्यात आली आहे. त्याला वासू-सपनाचा संसार, एक दुजे के लिए, खुर्चीचा प्रेम रोग, अशी अनेक नावं देण्यात आलेली आहेत.

Saamana : सामनाकडून दिपाली सय्यद इग्नोर, मात्र वासू-सपनाचा संसार, खुर्चीचा प्रेमरोग म्हणत शिंदे-फडणवीसांवर तुफान फटकेबाजी
खा. संजय राऊतImage Credit source: tv9
| Updated on: Jul 18, 2022 | 6:50 AM
Share

मुंबई : राज्यात कॅबिनेटच्या (Cabinet Expansion) विस्तारावरून सुरू झालेली तुफान फटकेबाजी अजूनही थांबायचं नाव येत नाहीये. कालच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी ठाकरे आणि शिंदे यांच्यात दोन दिवसात चर्चा होणार असल्याचा अदाज वर्तवला. तसेच ही शिवसैनिकांची इच्छा असल्याचेही बोलून दाखवले, मात्र शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने (Saamna) दिपाली सय्यद यांना थेट इग्नोर मारलंय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण या चर्चेच्या चर्चेवर एकही बातमी सामनातून दिसून आलेली नाही. तसेच सामनातून आज पुन्हा शिंदे आणि फडणवीसांवर तुफान फटकेबाजी करण्यात आली आहे. त्याला वासू-सपनाचा संसार, एक दुजे के लिए, खुर्चीचा प्रेम रोग, अशी अनेक नावं देण्यात आलेली आहेत. त्यावरही आता तीव्र् प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

सामनातून नेमकं काय म्हटलंय?

महाराष्ट्रात सध्या अस फडणवीस शिंदे हे दोघांचेच सरकार व दोघांचेच मंत्रिमंडळ हा एक अनोखा प्रयोग म्हणायला हरकत नाही. राजकीय व नियोजन मृणायचे ते हेच, पण सर्वोच्च न्यायालयाने सक्तीची नसबंदी केल्यानेच वासू-सपना सरकारवर ही वेळ ओढवली आहे. पंगत मांडलीय, मांडव सवलाय, पण बँडबाजा-बरात रस्त्यात अडकलीय. त्यामुळे वेळ घालविण्यासाठी औरंगाबादचे संभाजीनगर करण्यावर रोक लावणे, ठाकरे सरकारचे लोककल्याणकारी निर्णय थांबवणे, आरचे जंगल नष्ट करणे असले प्रकार केले जात आहेत. या ‘प्रेमरोगा’ वासू-सपनाच्या राजकीय संसाराचे काय हावये ते होईल पण महाराष्ट्राच्या बाबतीत देदेवाकडे घडवू पाहणार असतील तर ते सहन करता येणार नाही. महाराष्ट्रावर धोक्याची गिधाडे फडफडत आहेत, पण महाराष्ट्र नाउमेद होणार नाही, लढत राहील। अशी कडकडीत टीका सामनातून करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ कुठे आहे?

हे टीका प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर  “त्यांचे नाते उगे आहे. त्यांची ‘आशिकी’ सत्तेची आहे. त्यांना खुर्चीचा ‘प्रेमरोग’ जडला आहे. खुर्चीलाच ‘अनारकली’ मानून त्यांच्या प्रेमाचे जप-बाप सुरू आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात ही नवी ‘लव्हस्टोरी-२२’ उदयास आली आहे. ते दोघे बीजवर आहेत, त्यातील एका गटाने पर शिवसेनेच्या नावाने आणाभाका घेऊन बांधलेले मंगळसूत्र ताड़कन तोडले, पण तरीही शिवसेनेशिवाय त्यांचा दिवस आगत नाही की मावळत नाही, बासू सपनाच्या नव्या प्रेमकहाणीतला हा एक भाग आहे. या अद्यापि मंत्रिमंडळाचे हाड जमवता आलेले नाही. मंत्रिमंडळरूपी क्हाड कोठे? प्रश्नच आहे.” असाही सवाल सामनातून करण्यात आलाय.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.