AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत सुकलेल्या तलावात भाजपचं ‘कमळ’, काँग्रेसचं अस्तित्व नाही, केजरीवालांवर ‘सामना’तून स्तुतिसुमनं

केजरीवाल यांनी मागच्या पाच वर्षात केलेल्या कामांवर मतं मागितली आहेत. देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे, असं म्हणत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं सामनातून कौतुक करण्यात आलं आहे.

दिल्लीत सुकलेल्या तलावात भाजपचं 'कमळ', काँग्रेसचं अस्तित्व नाही, केजरीवालांवर 'सामना'तून स्तुतिसुमनं
| Updated on: Feb 07, 2020 | 7:55 AM
Share

मुंबई : दिल्लीत काँग्रेसचं अस्तित्व फारसं उरलेलं नाही. भाजप सुकलेल्या तलावात कमळ फुलवीत आहे. एक केजरीवाल सगळ्यांना लय भारी पडताना दिसत आहेत, अशा शब्दात शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर स्तुतिसुमनं (Saamana Praises Arvind Kejriwal) उधळण्यात आली आहेत.

‘दिल्लीत काँग्रेसचं अस्तित्व फारसं उरलेलं नाही. भाजप सुकलेल्या तलावात कमळ फुलवीत आहे. त्यांच्या या नव्या फुलोत्पादनाला आमच्या शुभेच्छा. पण केजरीवाल यांनी मागच्या पाच वर्षात केलेल्या कामांवर मतं मागितली आहेत. देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे. राजकीय मतभेदांच्या पलिकडे जाऊन या प्रयोगाचे स्वागत केले पाहिजे. एक केजरीवाल सगळ्यांना लय भारी पडताना दिसत आहेत. दिल्लीचे मतदार सूज्ञ झाले आहेत. त्यांना शहाणपणाचे डोस पाजण्याची गरज नाही.’ असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

महाराष्ट्र हातचे गेले, झारखंडमध्ये दारुण पराभव झाला, त्यामुळे दिल्लीत तरी झेंडा फडकवावा, असं भाजपला वाटल्यास चुकीचं काय? असं म्हणत शिवसेनेने टोला लगावला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी 200 खासदार, भाजपचे सर्व मुख्यमंत्री, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ कामाला लागले आहे, पण इतकं करुनही एक केजरीवाल सगळ्यांना भारी, असं चित्र स्पष्ट झाल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.

एखाद्या राज्यात कोणी चांगलं काम करत असेल, आणि ते राज्य आपल्या विचाराचे नसेल, तरीही चांगल्याला चांगले म्हणणे आणि ते काम पुढे घेऊन जाणे, हे देशाच्या लोकनायकाचे काम असते, पण ही मनाची दिलदारी आज उरली कुठे? असा प्रश्न सामनातून विचारण्यात आला आहे.

याआधी, अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या वेळीही ‘सामना’तून निषेध व्यक्त करण्यात आला होता. शाईफेक किंवा बूटफेक हा कोणत्याही राजकीय समस्येवर तोडगा असू शकत नाही, असं 2019 मधील अग्रलेखात (Saamana Praises Arvind Kejriwal ) म्हटलं होतं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.