AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत सुकलेल्या तलावात भाजपचं ‘कमळ’, काँग्रेसचं अस्तित्व नाही, केजरीवालांवर ‘सामना’तून स्तुतिसुमनं

केजरीवाल यांनी मागच्या पाच वर्षात केलेल्या कामांवर मतं मागितली आहेत. देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे, असं म्हणत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं सामनातून कौतुक करण्यात आलं आहे.

दिल्लीत सुकलेल्या तलावात भाजपचं 'कमळ', काँग्रेसचं अस्तित्व नाही, केजरीवालांवर 'सामना'तून स्तुतिसुमनं
| Updated on: Feb 07, 2020 | 7:55 AM
Share

मुंबई : दिल्लीत काँग्रेसचं अस्तित्व फारसं उरलेलं नाही. भाजप सुकलेल्या तलावात कमळ फुलवीत आहे. एक केजरीवाल सगळ्यांना लय भारी पडताना दिसत आहेत, अशा शब्दात शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर स्तुतिसुमनं (Saamana Praises Arvind Kejriwal) उधळण्यात आली आहेत.

‘दिल्लीत काँग्रेसचं अस्तित्व फारसं उरलेलं नाही. भाजप सुकलेल्या तलावात कमळ फुलवीत आहे. त्यांच्या या नव्या फुलोत्पादनाला आमच्या शुभेच्छा. पण केजरीवाल यांनी मागच्या पाच वर्षात केलेल्या कामांवर मतं मागितली आहेत. देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे. राजकीय मतभेदांच्या पलिकडे जाऊन या प्रयोगाचे स्वागत केले पाहिजे. एक केजरीवाल सगळ्यांना लय भारी पडताना दिसत आहेत. दिल्लीचे मतदार सूज्ञ झाले आहेत. त्यांना शहाणपणाचे डोस पाजण्याची गरज नाही.’ असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

महाराष्ट्र हातचे गेले, झारखंडमध्ये दारुण पराभव झाला, त्यामुळे दिल्लीत तरी झेंडा फडकवावा, असं भाजपला वाटल्यास चुकीचं काय? असं म्हणत शिवसेनेने टोला लगावला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी 200 खासदार, भाजपचे सर्व मुख्यमंत्री, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ कामाला लागले आहे, पण इतकं करुनही एक केजरीवाल सगळ्यांना भारी, असं चित्र स्पष्ट झाल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.

एखाद्या राज्यात कोणी चांगलं काम करत असेल, आणि ते राज्य आपल्या विचाराचे नसेल, तरीही चांगल्याला चांगले म्हणणे आणि ते काम पुढे घेऊन जाणे, हे देशाच्या लोकनायकाचे काम असते, पण ही मनाची दिलदारी आज उरली कुठे? असा प्रश्न सामनातून विचारण्यात आला आहे.

याआधी, अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या वेळीही ‘सामना’तून निषेध व्यक्त करण्यात आला होता. शाईफेक किंवा बूटफेक हा कोणत्याही राजकीय समस्येवर तोडगा असू शकत नाही, असं 2019 मधील अग्रलेखात (Saamana Praises Arvind Kejriwal ) म्हटलं होतं.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.