AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारथीच्या बैठकीत मराठा समाज समन्वयकांचा गोंधळ, संभाजीराजेंना मंचाखाली बसवल्याने वाद

संभाजी राजे यांनी आपण सामान्य जनतेचा प्रतिनिधी असल्याचे सांगत तिसऱ्या रांगेत बसण्याची तयारी दर्शवली

सारथीच्या बैठकीत मराठा समाज समन्वयकांचा गोंधळ, संभाजीराजेंना मंचाखाली बसवल्याने वाद
| Edited By: | Updated on: Jul 09, 2020 | 12:59 PM
Share

मुंबई : मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या बैठकीत गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीराजे यांना व्यासपीठाखाली बसवल्यामुळे मराठा समाज समन्वयकांनी गोंधळ घातला. (Saarathi Meeting Maratha Protesters Ruckus as Chhatrapati Sambhajiraje sits in third row)

जाणून बुजून छत्रपतींचा अपमान केल्याचा आरोप मराठा समाज समन्वयकांनी केला. संभाजीराजे यांनी मात्र “मी समाजासाठी आलोय. मला खाली बसण्यात कसलाही अपमान वाटत नाही” अशी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यानंतर अजित पवारांनी चूक सुधारत राजेंना वरती येण्याचा आग्रह केला.

संभाजी राजे यांनी आपण सामान्य जनतेचा प्रतिनिधी असल्याचे सांगत तिसऱ्या रांगेत बसण्याची तयारी दर्शवली. “गोंधळ घालू नका. आपल्याला समाज महत्वाचा आहे. समाजासाठी आपण मान अपमान न मानता बैठक करू. निर्णय महत्वाचा आहे. सारथी महत्वाची आहे.” असे आवाहन त्यांनी मराठा समाज समन्वयकांना केले.

मराठा समाज समन्वयक काय म्हणाले?

जाणून बुजून छत्रपतींचा अपमान केल्याचा आरोप मराठा समाज समन्वयकांनी केला. “मी बाहेर जाऊ का?” असे संभाजीराजेंनी विचारताच “असं नाही, तुमची इच्छा, त्यापेक्षा आम्ही जातो न बाहेर, उद्या आम्हाला पण विचारतील ना. छत्रपतींबरोबर गेला होतात, खाली बसवायला गेला होतात का? बाहेर काय तोंड द्यायचं आम्ही? बाहेर आम्हाला लोक काय बोलणार? बाहेर एक माणूस तोंड काढू देणार नाही छत्रपती बाहेर बसले तर” असे मराठा समाज समन्वयक म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

या बैठकीला उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आधी बैठकीबाहेर गेले. त्यानंतर “मला अजित पवार यांनी विनंती केली, कीआत बोलू” अशी प्रतिक्रिया देत छत्रपती संभाजीराजेही बैठकीतून बाहेर पडले. दोघांमध्ये पुन्हा दुसऱ्या दालनात स्वतंत्र चर्चा झाली.

दरम्यान, “या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची? सारथीमध्ये पगार नाही, मानधन नाही असे किमान पाचशे जण आहेत. त्यांना आधी रोजगार द्या मग, महाजॉब्ससारखी पोर्टल सुरु करा” अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.

संबंधित बातम्या :

अजित पवारांचा छत्रपती संभाजीराजेंना फोन, ‘सारथी’ प्रश्नी बैठकीला येण्याची विनंती

(Saarathi Meeting Maratha Protesters Ruckus as Chhatrapati Sambhajiraje sits in third row)

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.