AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीतील राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हत्येचं गूढ अखेर उकललं!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर पाटील यांची काल हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येचं गुढ आता उकललं आहे. भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी शिवसेनेच्या दिनकर पाटील याने मनोहर पाटलांची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

सांगलीतील राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हत्येचं गूढ अखेर उकललं!
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Feb 07, 2020 | 4:25 PM
Share

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर पाटील यांची काल हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येचं गुढ आता उकललं आहे. भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी शिवसेनेच्या दिनकर पाटील याने मनोहर पाटलांची हत्या केल्याचं समोर आलं आहे (NCP Leader Manohar Patil Murder). मनोहर पाटील आणि दिनकर पाटील यांच्यातल्या राजकीय वर्चस्ववादामुळे सांगलीत हा हत्येचा थरार रंगला.

कवठेमहांकाळ तालुक्यातील परंपरागत राजकीय वर्चस्ववाद आहे. त्यातून 2016 साली शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुख दिनकर पाटील (Shivsena Dinkar Patil) यांच्या भावाची हत्या झाली होती. या हत्येच्या प्रकरणात मनोहर पाटील यांनी हल्लेखोरांना आर्थिक मदत केल्याचा संशय दिनकर पाटलांना होता (NCP Leader Manohar Patil Murder). त्या रागातून गुरुवारी (6 जानेवारी) दिनकर पाटील यांनी पुतण्या आणि एका साथीदाराच्या मदतीने राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांची हत्या केली. हत्येच्या या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शिवसेनेचे पदाधिकारी दिनकर पाटील यांच्यासह अन्य दोघांना अटक केली आहे. मनोहर पाटील हे राष्ट्रवादीचे नेते आणि कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती होते.

कवठेमंकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिनकर पाटील यांची राजकीय कारकीर्द नेहमीच हत्येच्या घटनेत गुंफली गेली होती. काहीवर्षांपूर्वी पवनचक्कीच्या वादातून दिनकर पाटील यांनी रामचंद्र जाधव यांची हत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणातून दिनकर पाटील यांची निर्दोष सुटका झाली होती. रामचंद्र जाधव हे मनोहर पाटील यांचे समर्थक होते. या घटनेतून दिनकर पाटील यांची सुटका होताच न्यायालयाच्या आवारात पाटील समर्थकांनी जल्लोष केला होता. तेव्हापासून दिनकर पाटील आणि मनोहर पाटील यांच्या गटात धुसफूस सुरु होती.

2016 साली निवडणुकीच्या वादातून दिनकर पाटील यांचे बंधू युवराज पाटील यांची कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली-टी येथे निर्घुण हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या कटात मनोहर पाटील यांचा सहभाग असून हल्लेखोरांना आर्थिक रसद पुरवण्याचा संशय दिनकर पाटील यांच्या मनात होता. 2016 पासूनच हा राजकीय वाद गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे वळला. आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दिनकर पाटील यांनी आपल्या पुतण्याच्या मदतीने मनोहर पाटील यांचा काटा काढला.

हरोली-टी येथे मनोहर पाटील हे ऊसतोडणी मजुरांशी चर्चा करत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मनोहर पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिथे मनोहर पाटील यांना मृत घोषित करण्यात आले.

यानंतर राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील हत्या प्रकरणी तीन आरोपींना कवठेमहंकाळ पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. दिनकर बाळासो पाटील यांनी आपल्या पुतण्याच्या मदतीने मनोहर पाटील यांची हत्या केल्याचं उघड झाले आहे. यामध्ये दिनकर बाळासो पाटील, अभिजीत युवराज पाटील, विनोद बाजीराव पाटील यांना अटक करण्यात आली आहे. यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचा खून झाल्याची घटना गंभीर आहे. सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख या दोन्ही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सखोल तपास करतील अशी अपेक्षा आहे. जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल”, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणावर दिली.

Follow Us
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?