AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल, शंकराचार्य नाही”; संजय निरुपम यांनी सुनावले

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना नेते उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर आता यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे.

मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल, शंकराचार्य नाही; संजय निरुपम यांनी सुनावले
| Updated on: Jul 16, 2024 | 11:46 AM
Share

Sanjay Nirupam On Uddhav Thackeray was betrayed statement : “उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे माहीत आहे. ज्या लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात केला, ते हिंदू कसे असू शकतात?” असा प्रश्न ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी उपस्थित केला. ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना नेते उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर आता यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. आता या प्रकरणावरुन शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी सुनावले आहे.

“हा विश्वासघात नाही का?”

“शंकराचार्यांचे पद हे श्रद्धेचे पद आहे. शंकराचार्यजींनी काल ज्या पद्धतीने राजकीय भाष्य केले, त्यावर आमचा आक्षेप आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजप सोडला. हा विश्वासघात नाही का?” असा प्रश्न संजय निरुपम यांनी उपस्थित केला. नुकत्याच एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल”

“जगतगुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे धार्मिक कमी आणि राजकीय जास्त आहेत. उद्धव ठाकरेंना भेटणं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. यावर कोणताही आक्षेप नाही. मात्र त्यांनी शिवसेनेच्या अंतर्गत वादावर राजकीय भाष्य करणे टाळायला हवे होते. ते त्यांना शोभत नाही. मुख्यमंत्री कोण होणार आणि कोण नाही हे जनता ठरवेल, शंकराचार्य नाही”, अशा शब्दात संजय निरुपम यांनी शं‍कराचार्यांवर जोरदार निशाणा साधला.

“विश्वासघात हा मानवी दुर्गुण”

“जे लोक विश्वासघात करतात ते हिंदू असू शकत नाहीत. हे फार विचित्र तर्क आहे. सर्वप्रथम हे ठरवावे लागेल की विश्वासघात कोणी केला? आणि शंकराचार्य हे ठरवू शकत नाहीत. दुसरे, हिंदू पौराणिक कथा आणि इतिहासात विश्वासघाताची अनेक उदाहरणे आहेत. तो हिंदू नव्हता का? विश्वासघात हा मानवी दुर्गुण आहे. त्याचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. होय, या अवगुणामुळे एखादा चांगला किंवा वाईट हिंदू असू शकतो. पण तो हिंदू असू शकत नाही, हा खोटापणा आहे”, असेही संजय निरुपम यांनी सांगितले.

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?