AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहन भागवत यांनी हे सरकार खाली खेचावं त्यांच्याकडे ही क्षमता आहे, संजय राऊत यांचे आव्हान

चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांची मेहरबानी राहील तोपर्यंत ही सत्ता राहील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. चंद्रबाबू नितीश कुमार आणि मांझी यांना काय मिळालं? कोणते मोठे मंत्रालय मिळाले ? कोणाला काही मिळाले फक्त भाजप आणि आपापसात वाटून घेतला आहे.

मोहन भागवत यांनी हे सरकार खाली खेचावं त्यांच्याकडे ही क्षमता आहे, संजय राऊत यांचे आव्हान
sanjay raut
| Updated on: Jun 11, 2024 | 12:18 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मौन सोडत मणिपूरबाबत विधान केले. आता निवडणूक प्रचार संपला आहे. कटुता संपवा अन् मणिपूरकडे लक्ष द्या, असे मोहन भागवत यांनी म्हटले. त्यावरुन शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. मोहन भागवत यांना काही वाटत असेल तर सरकारला हटवा. मोहन भागवत यांच्या आशीर्वादाने सरकार सुरू आहे. जे अहंकार बाळगत आहेत त्यांना सत्तेवरून बाजूला काढून पहा. तुम्ही आशीर्वाद सरकारला का देताय? मोहन भागवत यांनी संघ आणि भाजपचा काही संबंध नाही, असे स्पष्टपणे सांगावे, असा हल्ला संजय राऊत यांनी केला आहे.

तुम्हाला सत्तेवरुन खाली खेचणार

शरद पवार भटकती आत्मा आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. केंद्र सरकारमध्ये दोन अतृप्त आत्मा आहेत. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोन अतृप्त आत्म्यांचा तुम्ही समाधान करा. भटकती आत्मा कोणाचा पिछा सोडत नाही. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाच्या पदावरून हटवत नाही तोपर्यंत आमची आत्मा शांत होणार नाही. नरेंद्र मोदी यांना अतृप्त आत्म्यांची शांती करावी लागेल. ज्याप्रकारे मंत्रिमंडळ तयार केले कॅबिनेट मंत्रीपद दिली, खातेवाटप झाले, त्यानंतर अनेक अतृप्त आत्मा पाहायला मिळतात. एनडीएच्या मित्र पक्षांमध्ये हे पाहायला मिळते. जोपर्यंत सत्तेपासून तुम्हाला खेचणार नाही तोपर्यंत आमची आत्म अतृप्त राहील. तोपर्यंत आमची आत्मा महाराष्ट्रात भटकत राहील.

हे सरकार टिकणार नाही

आता एनडीए सरकारमध्ये आम्ही मोदींना प्रश्न विचारणार नाहीत. आम्ही चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना प्रश्न विचारणार आहोत. कारण या दोघांचा संयोग सरकार बनवण्यासाठी आहे. त्यांच्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी बनू शकत नव्हते. नरेंद्र मोदी यांची सत्ता ही उधार सत्ता आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांची मेहरबानी राहील तोपर्यंत ही सत्ता राहील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. चंद्रबाबू नितीश कुमार आणि मांझी यांना काय मिळालं? कोणते मोठे मंत्रालय मिळाले ? कोणाला काही मिळाले फक्त भाजप आणि आपापसात वाटून घेतला आहे. हे सरकार टिकणार नाही आजपासून कोणत्याच पक्षाला मोठे मंत्रिपद मिळाले नाही. ईडी आणि सीबीआयचे हत्यार बाजूला काढा आणि लढून दाखवा, हे जर तुम्ही बाजूला काढलं तर एक मिनिट सुद्धा तुम्ही आमच्या समोर टिकणार नाहीत. त्याचा दुरुपयोग करत आणि तुम्ही आमच्या सोबत लढत आहात.

Follow Us
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले.
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय....
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय.....
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक.
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक...
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक....
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय.
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली...
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली....
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता.
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार...
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार....
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय.
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर...
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर....