AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तर मी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी माफी मागेन : संजय राऊत

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Sanjay Raut on Sushant Singh Suicide).

... तर मी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी माफी मागेन : संजय राऊत
| Updated on: Aug 12, 2020 | 2:11 PM
Share

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Sanjay Raut on Sushant Singh Suicide). मी एक संवेदनशील व्यक्ती आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसेच मुंबई पोलीस सक्षम असून तेच या प्रकरणाचा तपास करतील असंही नमूद केलं.

संजय राऊत म्हणाले, “राज्य सरकार अजिबात अस्थिर नाही. अशा प्रकरणांमुळे सरकार अस्थिर होत असेल, तर मग केंद्रातलं सरकार पडेल. मुंबई पोलीस सक्षम आहेत. तेच या प्रकरणाचा तपास करतील. मुंबई पोलिसांना अस्वस्थ करुन त्यांच्यावर दबाव आणून कोणाला काही लपवण्याची दुर्बुद्धी सुचली असेल, तर ईश्वर त्यांना समबुद्धी देवो.”

“या प्रकरणाला न्याय मिळो. मला सुशांतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे ते माहिती नाही. मी संवेदनशील व्यक्ती आहे. मला जर वाटलं की आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेल. मी माझ्या माहितीच्या आधारे बोललो आहे. त्यांचं कुटुंब त्यांच्या माहितीच्या आधारे बिहारमधून आरोप करतंय.”

“काय करायंचंय ते आम्ही आणि सुशांतचं कुटुंब पाहू. माध्यमांनी बोलायचं काही काम नाही. काही जण महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं काम करत आहेत. आगामी काळात हे कोण आहेत ते आम्ही सांगू,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“राजस्थानचा संबंध महाराष्ट्राशी लावू नका, महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे”

संजय राऊत म्हणाले, “राजस्थानचा संबंध महाराष्ट्राशी लावू नका. महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात पाऊस पडतोय त्यात सगळं हे वाहून गेलंय. विरोधकांचा आत्मानंद आहे. राज्यापुढे खूप प्रश्न आहेत. विरोधकांना हे सरकार पाडणं, अस्थिर करणं यात रस आहे. त्यांनी जनतेच्या दुःखावर पोळ्या भाजत राहावं. आम्हाला खूप कामं आहेत.”

“आम्हाला 50/100 नोटीस येत राहतात. बाकी मला काहीच माहिती नाहीये. पार्थ पवारची भूमिका वेगळी नाहीये. आम्ही सगळे एकत्र आहोत. अशावेळी राजकारण केलं जातंय. ही राजकारण करण्याची वेळ नाहीये. मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याचे प्रश्न सुटावेत अशी आमची अपेक्षा आहे,” असंही ते म्हणाले.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

युरोप टूरवर हॉटेलमध्ये भूत दिसल्याने सुशांतचा थरकाप, इटलीहून अर्ध्यावर परतलो, रियाचा दावा

Sushant Death Case | बिहार निवडणुकांमुळे सुशांतच्या मृत्यूचे राजकारण, महाराष्ट्राचा दावा, तिवारी क्वारंटाईन प्रकरणही गाजले, सुप्रीम कोर्टात काय काय झाले?

Rhea Chakraborty ED | तू माझ्याशी का बोलली नाहीस? सुशांतच्या वडिलांचा रियाला मेसेज

Sanjay Raut on Sushant Singh Suicide

Follow Us
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....