AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांतला मी बिहारचा मानत नाही, तो मुंबईचाच, त्याला बिहारमध्ये कोण ओळखत होतं? : संजय राऊत

सुशांतला मी बिहारचा मानत नाही. तो मुंबईचा होता. बिहारमध्ये असताना त्याला कोण ओळखत होतं?, तो मुंबईत आला आणि त्याच्या कामाने त्याला ओळख मिळाली. मुंबई ही त्याची कर्मभूमी आहे, असं राऊत म्हणाले.

सुशांतला मी बिहारचा मानत नाही, तो मुंबईचाच, त्याला बिहारमध्ये कोण ओळखत होतं? : संजय राऊत
| Updated on: Nov 14, 2020 | 11:34 AM
Share

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतला मी बिहारचा मानत नाही. तो मुंबईचाच होता. बिहारमध्ये त्याला कोण ओळखत होतं?, असं वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ‘शट अप या कुणाल’ या खास मुलाखतीत राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. (Sanjay Raut On Sushant Sinh Rajput)

“सुशांतला मी बिहारचा मानत नाही. तो मुंबईचा होता. बिहारमध्ये असताना त्याला कोण ओळखत होतं?, तो मुंबईत आला आणि त्याच्या कामाने त्याला ओळख मिळाली. मुंबई ही त्याची कर्मभूमी होती”, असं राऊत म्हणाले.

“सुशांतला न्याय मिळाला पाहिजे, हे ओरडणाऱ्यांपेक्षा आम्हाला जास्त वाटतं. ओरडून खोट्याचं खरं करता येत नसतं. सुशांतसोबत खरंच काही चुकीचं घडलं असेल तर आम्ही त्याला न्याय देऊ”, असंही राऊत म्हणाले.

“कुणी कितीही ओरडलं तरी खोटं ते खोटं खोटं… न्याय देण्याच्या गोष्टी करणाऱ्यांनी हळू बोलावं पण खरं बोलावं, असा टोला राऊत यांनी रिपब्लिकचे संपादक अर्णव गोस्वामी यांना लगावला. तसंच विवेकानंदांचा शांततेचा विचार जगभर गेला, त्यामुळे शांत आणि खरं बोलण्याची भूमिका ठेवा, असा सल्लाही राऊत यांनी दिला.

“सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी तपास केला तोच तपास खरा आहे यावर शिक्कामोर्तब झालंय. मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे. देशाची सगळ्यात जास्त विश्वासार्ह मुंबई पोलिस फोर्स आहे. वर्दीवर विश्वास ठेवला पाहिजे, असंही राऊत यांनी नमूद केलं.

“अमुक व्यक्ती सरकारच्या विरोधात बोललं की कारवाई करा, असं मुंबई पोलिसांना सांगितलेलं नाही. कारण तो पोलिसांचा अधिकार आहे की कुणावर कारवाई करायची, कोणत्या वेळी अ‌ॅक्शन घ्यायची. मुख्यमंत्र्यावर, शरद पवारांवर, संजय राऊतांवर कुणी टीका केली म्हणजे त्यावर कारवाई करा, असं सरकारने पोलिसांना सांगितलेलं नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे”, असंही सांगायला राऊत विसरले नाहीत. (Sanjay Raut On Sushant Sinh Rajput)

संबंधित बातम्या

‘बाळासाहेबांनी मला 28 व्या वर्षी संपादक बनवलं, म्हणून….’ कुणाल कामराच्या ‘त्या’ प्रश्नावर संजय राऊतांचं भावनिक उत्तर

भाजपसोबत आमचा भावनिक बंध होता, 25 वर्षांचं नातं तोडताना खूप दु:ख झालं: संजय राऊत

Follow Us
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित.