AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेवर संकट, संजय राऊत यांचं ‘हे’ पद जाणार, शिंदे गटाचं पुढचं टार्गेट काय?

संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी आक्रमक सवाल केला. कार्यालयांचा ताबा  ते घेतील. पण महाराष्ट्रातील जनता खवळली आहे. त्यांचा ताबा कोण घेणार?...

शिवसेनेवर संकट, संजय राऊत यांचं 'हे' पद जाणार, शिंदे गटाचं पुढचं टार्गेट काय?
Image Credit source: social media
| Updated on: Feb 21, 2023 | 11:21 AM
Share

मुंबईः चहुबाजूंनी आव्हानांनी वेढलल्या शिवसेनेसमोर (Shivsena) आणखी एक मोठं संकट उभं ठाकलं आहे. शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचं संसदेतील मुख्यनेते पद जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. निवडणूक आयोगाचा (Election commission) निर्णय आल्यानंतर एकनाथ शिंदे गट अधिक आक्रमक झाल्याचं चित्र पहायला मिळतंय. याच मालिकेत आता संसदीय मुख्य नेते पद संजय राऊत यांच्याकडून काढून घेतलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांची यापदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

शिवसेनेतील प्रमुख पदे आता शिंदे गटाकडे जाणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर संजय राऊत यांच्या बाबतीत काय बदल घडतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत काल विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी माध्यमांना प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. सगळं आताच सांगू का, असा प्रति सवाल शिंदे यांनी केला.

एकनाथ शिंदे पक्षप्रमुख पद स्वीकारणार?

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटातील शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्त्वाची बैठक आज बोलावली आहे. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. बैठकीला शिंदे गटाचे सर्व आमदार-खासदार उपस्थित राहणार आहे. याच बैठकीत संजय राऊत यांचं संसदीय प्रमुख पद काढून घेतलं जाणार असल्याची चर्चा आहे. तर शिवसेनेचं पक्ष प्रमुख पद स्वीकारणार असल्याचीही चर्चा आहे.

खवळलेल्या शिवसैनिकांचा ताबा कोण घेणार?

शिवसेनेची सगळी कार्यालयं आणि पदांचा ताबा शिंदे गट घेत आहे. यावरून संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. कार्यालयांचा ताबा  ते घेतील. पण महाराष्ट्रातील जनता खवळली आहे. त्यांचा ताबा कोण घेणार?

संजय राऊत म्हणाले, शिवसेना महाराष्ट्राचा आत्मा, आवाज आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई, मराठी माणसांनी याची स्थापना केली. तीच शिवसेना खतम करण्यासाठी आपल्या देशात दिल्लीश्वरांनी ६० वर्षांपासून प्रयत्न सुरु केले. वेळोवेळी ते आम्ही हाणून पाडले. पण आता काही लोकांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळालं असलं तरी महाराष्ट्राची जनता या अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली आहे. तुम्ही फक्त निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा…

Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.