Sanjay Raut: अब्दुल सत्तारांची हळद अजून उतरायची आहे, त्यांना बोलायचं ते बोलू द्या, संजय राऊतांचा टोला

पणजीः नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मध्यस्थी करत पूल बांधला तर भाजप आणि शिवसेनेची युती होऊ शकते, असं वक्तव्य करत शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, शिवसेनेला भाजपशी युती करावीच लागेल, अशाही चर्चा सुरु आहेत. याविषयी […]

Sanjay Raut: अब्दुल सत्तारांची हळद अजून उतरायची आहे, त्यांना बोलायचं ते बोलू द्या, संजय राऊतांचा टोला
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 4:12 PM

पणजीः नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मध्यस्थी करत पूल बांधला तर भाजप आणि शिवसेनेची युती होऊ शकते, असं वक्तव्य करत शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, शिवसेनेला भाजपशी युती करावीच लागेल, अशाही चर्चा सुरु आहेत. याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलीच तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे. भाजप-शिवसेना युतीबाबत कोण बोलतंय, कुणी प्रमुख नेता बोलतोय का, हे आधी तपासून घ्या, असे ते म्हणाले. अब्दुल सत्तार अजून शिवसेनेत नवे आहेत, त्यांची हळद आणखी उतरायची आहे, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

सत्तारांची हळद उतरायची आहे- संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, ‘ हे जे मंत्री आहेत त्यांनी पक्षात 25 वर्ष पूर्ण केली तर त्यांच्या विधानाला काही अर्थ राहील, अजून त्यांच्या अंगावरची हळद उतरायची आहे बरीचशी. अजून त्यांना शिवसेनेची हळद पूर्णपणे लागायची आहे. बोलू द्या त्यांना, दुसरं कोण बोलतंय का? प्रमुख लोकांपैकी?

विरोधी पक्षाच्या हातात कोलीत देऊ नये- संजय राऊत

अब्दुल सत्तार यांच्या युतीसंदर्भातल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी त्यांचे चांगलेच कान टोचले. ते म्हणाले, पक्ष समजून घ्यायला वेळ लागतो. माझ्या सारखा माणूस जन्मताच पक्षात आहे. मला काय बोलायचं यासाठी मार्गदर्शन घ्यायची गरज पडत नाही. जे सेनेत जन्माला आले नाहीत त्यांना किमान 20 वर्ष पुढची शिवसेनेत घालवावी लागतील. मग त्यांनी सेनेतील घडामोडीविषयी बोलले पाहिजे. सत्तार कांग्रेसमधून आले आहेत. हळूहळू रुळत आहेत. लोकप्रिय होत आहेत. पण अशाप्रकारे विधान करून अकारण विरोधी पक्षाच्या हातात कोलीत मिळेल वाद निर्माण होतील असं कोणी करू नये. असं करताना कोणी दिसत नाही. आमचा सर्वांचा विश्वास उद्धव ठाकरेंवर आहे. तेच नेतृत्व राज्याला पुढे घेऊन जातील.

इतर बातम्या-

मुलींच्या लग्नाचं वय किती असावं? जगभरातील देशात असलेले एकापेक्षा एक कायदे

Dombivali Crime: मोटारसायकलने फोडले लूटीचे बिंग, चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.