AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादकर, चंद्रकांत खैरेंना काहीही माहित नसतं, ते उगाच ढगात गोळ्या मारत असतात- शहाजी बापू पाटील

Shahaji Bapu Patil: चंद्रकांत खैरे आणि संदिपान भुमरे यांच्यातील शाब्दिक युद्ध अजून निवळलेलं नाही तोवरच आता असतानाच शहाजी बापू पाटील यांनीही खैरेंवर टीकास्त्र डागलंय.

औरंगाबादकर, चंद्रकांत खैरेंना काहीही माहित नसतं, ते उगाच ढगात गोळ्या मारत असतात- शहाजी बापू पाटील
| Updated on: Aug 30, 2022 | 2:23 PM
Share

मुंबई : सध्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Kahire) आणि शिंदे गटातली आमदारांमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. चंद्रकांत खैरे आणि संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्यातील शाब्दिक युद्ध अजून निवळलेलं नाही तोवरच आता असतानाच शहाजी बापू पाटील यांनीही खैरेंवर टीकास्त्र डागलंय. चंद्रकांत खैरे उगाच ढगात गोळ्या मारत असतात, असं शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) म्हणाले आहेत. “दोन महिने झाले, आमचं सरकार राज्यात सत्तेत आलंय. काही राजकीय घटना घडल्या. त्यामुळे हे सरकार बनलं. आमचं सध्या चांगलं चालू आहे. दोन महिन्यात सरकारचा कारभार चांगला चाललाय”, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे शहाजीबापूंच्या या विधानाला चंद्रकांत खैरे काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असेल.

चंद्रकांत खैरे औरंगाबादला राहतात त्यांना गोष्टी माहित नसतात. अन् ते उगाच ढगात गोळया मारत असतात, असं शहाजी बापू म्हणाले आहेत.

खैरे आणि भुमरे यांच्यातील वाद

चंद्रकांत खैरे यांनी मंत्री संदिपान भुमरे यांना गावठी मंत्री म्हणत हिणवलं. त्यावर होय मी आहेच गावठी, असं म्हणत भुमरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. आता या वादात शहाजीबापू पाटील यांनी उडी घेतली आहे.

नेमकं काय घडलं?

संदीपान भुमरे हे गावठी मंत्री आहेत त्यामुळे संदीपान भुमरे काहीही बोलत असतात, असं म्हणत त्यांनी संदिपान भुमरेंवर टीका केली आहे.“उद्धव ठाकरेंचे 2 समर्थक आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच शिंदे गटात सामील होतील”, असा दावा संदिपान भुमरे यांनी केला होता. त्यावर खैरेंनी उत्तर दिलं. “आमच्याकडचं कुणीही शिंदेगटात जाणार नाही. पण उलट यांचे 40 आमदार आम्हाला फोन करत आहेत. शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आम चं चुकलं!, असं म्हणतात. मी त्यांना म्हटलं की या मग परत उद्धव साहेबांकडं… त्यामुळे शिंदेंसोबत गेलेले 10-12 आमदार मूळ शिवसेनेत परत येणार आहेत”, असं विश्वास खैंरेंनी म्हटलं. त्याला आता भुमरेंनी प्रत्युत्तर दिलं. त्यावर आता शहाजीबापूंनीही त्यावर भाष्य केलंय.  खैरे ढगात गोळया मारत असतात, असं ते म्हणाले आहेत.

दसरा मेळावा वातावरण दिसुन आलं नाही,मेळावा जवळ आल्यावर मुख्यमंत्री काय धोरण घेतात यावर आहे,मुख्यमंत्री उपस्थितीतच मेळावा व्हावा अशी आमची इच्छा आहे, असंही शहाजी बापू म्हणालेत.

आता एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश
आता एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश.
नवी दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन
नवी दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन.
नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने 2.16 कोटींची फसवणूक
नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने 2.16 कोटींची फसवणूक.
ड्रग्ज प्रकरणाला इम्तियाज जलीलांचा सपोर्ट? संजय शिरसाटांचे गंभीर आरोप
ड्रग्ज प्रकरणाला इम्तियाज जलीलांचा सपोर्ट? संजय शिरसाटांचे गंभीर आरोप.
मुंबई पालिकेच्या महापौरपदावरुन महायुतीत एकमत? अपडेट आली समोर
मुंबई पालिकेच्या महापौरपदावरुन महायुतीत एकमत? अपडेट आली समोर.
शिंदे- ठाकरे भेटीवर राजकीय वाद; राऊत आणि बन यांच्यात टीका-प्रत्युत्तर
शिंदे- ठाकरे भेटीवर राजकीय वाद; राऊत आणि बन यांच्यात टीका-प्रत्युत्तर.
अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल
अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल.
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे.
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज.