AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादकर, चंद्रकांत खैरेंना काहीही माहित नसतं, ते उगाच ढगात गोळ्या मारत असतात- शहाजी बापू पाटील

Shahaji Bapu Patil: चंद्रकांत खैरे आणि संदिपान भुमरे यांच्यातील शाब्दिक युद्ध अजून निवळलेलं नाही तोवरच आता असतानाच शहाजी बापू पाटील यांनीही खैरेंवर टीकास्त्र डागलंय.

औरंगाबादकर, चंद्रकांत खैरेंना काहीही माहित नसतं, ते उगाच ढगात गोळ्या मारत असतात- शहाजी बापू पाटील
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 30, 2022 | 2:23 PM
Share

मुंबई : सध्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Kahire) आणि शिंदे गटातली आमदारांमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. चंद्रकांत खैरे आणि संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्यातील शाब्दिक युद्ध अजून निवळलेलं नाही तोवरच आता असतानाच शहाजी बापू पाटील यांनीही खैरेंवर टीकास्त्र डागलंय. चंद्रकांत खैरे उगाच ढगात गोळ्या मारत असतात, असं शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) म्हणाले आहेत. “दोन महिने झाले, आमचं सरकार राज्यात सत्तेत आलंय. काही राजकीय घटना घडल्या. त्यामुळे हे सरकार बनलं. आमचं सध्या चांगलं चालू आहे. दोन महिन्यात सरकारचा कारभार चांगला चाललाय”, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे शहाजीबापूंच्या या विधानाला चंद्रकांत खैरे काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असेल.

चंद्रकांत खैरे औरंगाबादला राहतात त्यांना गोष्टी माहित नसतात. अन् ते उगाच ढगात गोळया मारत असतात, असं शहाजी बापू म्हणाले आहेत.

खैरे आणि भुमरे यांच्यातील वाद

चंद्रकांत खैरे यांनी मंत्री संदिपान भुमरे यांना गावठी मंत्री म्हणत हिणवलं. त्यावर होय मी आहेच गावठी, असं म्हणत भुमरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. आता या वादात शहाजीबापू पाटील यांनी उडी घेतली आहे.

नेमकं काय घडलं?

संदीपान भुमरे हे गावठी मंत्री आहेत त्यामुळे संदीपान भुमरे काहीही बोलत असतात, असं म्हणत त्यांनी संदिपान भुमरेंवर टीका केली आहे.“उद्धव ठाकरेंचे 2 समर्थक आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच शिंदे गटात सामील होतील”, असा दावा संदिपान भुमरे यांनी केला होता. त्यावर खैरेंनी उत्तर दिलं. “आमच्याकडचं कुणीही शिंदेगटात जाणार नाही. पण उलट यांचे 40 आमदार आम्हाला फोन करत आहेत. शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आम चं चुकलं!, असं म्हणतात. मी त्यांना म्हटलं की या मग परत उद्धव साहेबांकडं… त्यामुळे शिंदेंसोबत गेलेले 10-12 आमदार मूळ शिवसेनेत परत येणार आहेत”, असं विश्वास खैंरेंनी म्हटलं. त्याला आता भुमरेंनी प्रत्युत्तर दिलं. त्यावर आता शहाजीबापूंनीही त्यावर भाष्य केलंय.  खैरे ढगात गोळया मारत असतात, असं ते म्हणाले आहेत.

दसरा मेळावा वातावरण दिसुन आलं नाही,मेळावा जवळ आल्यावर मुख्यमंत्री काय धोरण घेतात यावर आहे,मुख्यमंत्री उपस्थितीतच मेळावा व्हावा अशी आमची इच्छा आहे, असंही शहाजी बापू म्हणालेत.

Follow Us
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?