AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या उद्धव ठाकरेंना म्हणावं दोन मिनिटं इथे येऊन जा मग कळेल; शहाजीबापू यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख

आज एक घाव दोन तुकडे म्हणता. अडीच वर्षापूर्वी तुम्ही युतीचे तुकडे केले. आता कशाचे करता? तुम्ही आमदारांना फरफटत नेलं. आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उकिरड्यावर फेकून दिलं. ते पाप उद्धव ठाकरे तुम्ही केलं.

त्या उद्धव ठाकरेंना म्हणावं दोन मिनिटं इथे येऊन जा मग कळेल; शहाजीबापू यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख
शहाजीबापू यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेखImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2022 | 7:09 PM
Share

मुंबई: गुलाबराव, तुमच्याकडे फोन आहे का? तुमच्या पाया पडतो. त्या उद्धव ठाकरेंना फोन करा आणि दोन मिनिटं इथे येऊन जा म्हणावं. खरी कोणीत शिवसेना (shivsena) आहे तुला कळेल. हे भगवं वादळ उद्धव ठाकरे (uddhav thackeray) तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राची खरी शिवसेना कोणती आहे याचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार नाही, अशा शब्दात शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (shahaji bapu patil) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दसरा मेळावा बीकेसीमध्ये सुरू आहे. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. व्यासपीठावरील सर्व आमदार आणि खासदारांनी प्रत्येकाने जनतेला सांगितलं होतं की, निवडणूक झाल्यावर भाजप-शिवसेनेचं सरकार बनवू. निवडणूक झाली. मतमोजणी झाली. दोन्ही पक्षाचे आमदार निवडून आले. आम्ही आनंदात मुंबईत आलो आणि इथे आल्यावर बिघडा बिघडी सुरू झाली, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

आज गद्दारी केली. तेव्हा महाराष्ट्राने शाबासकी दिली असं म्हणायचं का? फडणवीसांच्या पाठित खंजीर खुपसला ते महाराष्ट्र अजून विसरला नाही. खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेला. मी काँग्रेसमध्ये होतो. बाळासाहेबांची सभा ऐकायचो. बाळासाहेब ठाकरे मैदाचं पोतं कुणाला म्हणाले? बारामतीचा मंमद्या कुणाला म्हटलं? दाऊदचा हस्तक कुणाला म्हटलं? विलायती सोनिया गांधी मला चालणार नाही असं कुणाला म्हणाले? शिवसेना प्रमुखांनी हे उद्गार कुणासाठी काढले होते?; असा सवाल त्यांनी केला.

आज एक घाव दोन तुकडे म्हणता. अडीच वर्षापूर्वी तुम्ही युतीचे तुकडे केले. आता कशाचे करता? तुम्ही आमदारांना फरफटत नेलं. आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उकिरड्यावर फेकून दिलं. ते पाप उद्धव ठाकरे तुम्ही केलं. एकनाथ शिंदेंनी ते पाप धुतलं. ही गद्दारी नाही. त्यांनी झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी उचलेलं पाऊल आहे. आमच्या नेत्यांचे अनेक मेळावे झाले. लाखाने लोक मेळाव्याला येत आहेत. हे कशाचं द्योतक आहे? असा सवालही त्यांनी केला.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.