AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करणारच, केंद्राने जबाबदारी झटकू नये : शंभुराज देसाई

राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यापासून मागे हटणार नाही मात्र, केंद्राने जबाबदारी झटकून चालणार नाही, असे देसाई म्हणाले आहेत. (Shambhuraj Desai said  MVA govt will help to rain affected people)

राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करणारच, केंद्राने जबाबदारी झटकू नये : शंभुराज देसाई
| Updated on: Oct 20, 2020 | 5:26 PM
Share

मुंबई : महापूर आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पिकांचे नुकसान झालं आहे, प्राथमिक माहिती घेऊन नुकसान भरपाई दिली जाईल, असे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यापासून मागे हटणार नाही मात्र, केंद्राने जबाबदारी झटकून चालणार नाही, असे देसाई म्हणाले आहेत. (Shambhuraj Desai said  MVA govt will help to rain affected people)

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोलापूरमध्ये पाहणी केली आहे. उद्या ते उस्मानाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पाहणी दौरा सुरू आहे. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य व केंद्र सरकार दोघांनी मदत करण्याची गरज देसाईंनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती खराब आहे म्हणून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार मागे हटणार नाही, असे शंभुराज देसाईंनी स्पष्ट केले. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी कॅगचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे करण्यात येत आहे. चौकशी कोणाला गप्प करण्यासाठी केली जात नसल्याचे शंभुराज देसाईंनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राला केंद्राकडून मिळणार नाही, असे फडणवीस यांना अपेक्षित आहे का? असा सवाल देसाईंनी फडणवीसांना केला. कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार सरकार करत आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या कायद्यांत बदल व्हायला पाहिजे, असं देसाई यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

Shambhuraj Desai | महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणार : शंभुराज देसाई

Headlines | महाविकासआघाडीचे सरकार 10 वर्ष टिकेल : शंभुराज देसाई | 5 PM

(Shambhuraj Desai said  MVA govt will help to rain affected people)

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.