AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांची भर पावसात सभा, श्रीनिवास पाटील यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या 2 घोषणा

पवारांच्या भाषणानंतर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी दोनच घोषणा दिल्या.

शरद पवारांची भर पावसात सभा, श्रीनिवास पाटील यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या 2 घोषणा
| Updated on: Oct 19, 2019 | 5:07 PM
Share

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar speech in rain)  यांचं साताऱ्यातील पावसातलं भाषण चांगलंच गाजलं. शुक्रवारी 18 ऑक्टोबर रोजी शरद पवारांनी (Sharad Pawar speech in rain) उभ्या पावसात न थांबता, न थकता, पावसाच्या धारा परतवून लावत उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. चूक झाली तर ती चूक कबूल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली, असं शरद पवार यांनी जाहीरपणे कबूल केले. तसेच ही चूक दुरुस्त करण्याची संधी 21 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी आहे असंही नमूद केलं. विशेष म्हणजे शरद पवार (Sharad Pawar speech in rain in Satara) यांच्या पायाला जखम झालेली होती. अशा स्थितीत देखील त्यांनी पाऊस कोसळत असताना पावसात भाषण केलं.

पवारांच्या भाषणानंतर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी दोनच घोषणा दिल्या. पवारांच्या भाषणावर कौतुकांचा वर्षाव होत असताना, श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांच्या दोन घोषणा जाता जाता दाद मिळवून गेल्या.

श्रीनिवास पाटील म्हणाले, “मान छत्रपतीच्या गादीला, मात्र तुमचं मत राष्ट्रवादीला……. ढगाला लागली कळंSSSS आणि राष्ट्रवादीला सारी मतं मिळं”

श्रीनिवास पाटलांच्या या दोन घोषणांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना स्फुरन चढलं.

महाराष्ट्र विधानसभेसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांच्यात लढत होत आहे. जेव्हा भर पावसात पवारांनी भाषण दिलं, त्याचंवेळी पवारांसोबत सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही भिजत होते.

संबंधित बातम्या 

पायाला जखम, भरपावसात भाषण, पाऊस कोसळला, पवार उदयनराजेंवर बरसले 

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.