AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar: संभाजीनगर नामांतरापासून शरद पवारांनी राखले अंतर, स्पष्टीकरण देताना पवार म्हणाले..

ख्यमंत्र्यांचे निर्णय हाच मंत्रिमंडळाचे निर्णय म्हणून जाहीर करण्यात येतो. या निर्णयाची माहिती नंतर मिळाल्याचं सांगत, हा पूर्णपणे शिवसेनेचा होता असे सांगत या निर्णयापासून अंतर राखण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला आहे.

Sharad Pawar: संभाजीनगर नामांतरापासून शरद पवारांनी राखले अंतर, स्पष्टीकरण देताना पवार म्हणाले..
संभाजीनगर नामांतरावर काय म्हणाले पवारImage Credit source: ani
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Jul 10, 2022 | 5:48 PM
Share

औरंगाबाद – औरंगाबादच्या संभाजीनगर (Sambhajinagar) नामांतराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अंतर राखले आहे. हा नामांतराचा मुद्दा महाविकास आघाडीच्या (MVA)किमान समान कार्यक्रमात हा मुद्दा नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय पूर्णपणे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा होता असेही त्यांनी सांगितले. बैठकीत मते व्यक्त करण्यात आली, मात्र मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिक्कामोर्तबब मुख्यमंत्री करतात. मुख्यमंत्र्यांचे निर्णय हाच मंत्रिमंडळाचे निर्णय म्हणून जाहीर करण्यात येतो. या निर्णयाची माहिती नंतर मिळाल्याचं सांगत, हा पूर्णपणे शिवसेनेचा होता असे सांगत या निर्णयापासून अंतर राखण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला आहे.  उद्धव ठाकरे यांच्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला औरंगाबादे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केलेला आहे.

देशात लोकशाही संस्था संपवण्याचे काम सुरु

देशात कर्नाटक, मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र आणि गोव्यात विरोधकांना फोडण्याचे काम सुरु आहे. यानिमित्ताने देशात वेगळ्या दिशेने लोकशाही संस्था संपवण्याचे काम सुरु असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. एक चुकीचा पायंडा राज्यात आणि देशात निर्माण होत असल्याची टीका त्यांनी यानिमित्ताने केली आहे. शिवसेनेचे बंड मोडून काढता आले नाही, याचे कारण सांगताना त्यांनी सांगितले की, अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संबंध होते, त्यांना या मार्गाने जायचे नाही असे सांगितल्यावर त्यांनी ऐकल्याचे पवार यांनी सांगितले आहे.

मध्यावधी निवडणुका होतील असे म्हणालो नव्हतो-पवार

राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असे म्हणालो नव्हतो. तयारीला लागा असे कार्यकर्त्यांना सांगितले होते. उद्याच्या होणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी सांगताना असे सांगितले होते की अजून अडीच वर्ष आहेत, निवडणुकांसाठी. मात्र सहा महिने वातावरण वेगळे असते त्यामुळे दोन वर्षांचा आपल्या हातात आहेत, त्यामुळे कामाला लागा असे कार्यकर्त्यांना सांगितले होते, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेच्या मतदारसंघांचा विचार केला नव्हता

राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा विचार आपण करत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. ही निवडणूक एकत्र लढावी अशी आपली वस्तूस्थिती आहे. मात्र याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी, काँग्रेस आणि शिवसेनेशी बोललेलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत