Subhash Desai : महाराष्ट्रात असते तर कोणत्याही बिळातून फरफटत आणलं असतं, 72 तास विमानतळाला घेराव घालू; सुभाष देसाईंचं थेट आव्हान

Subhash Desai : जेव्हा शिवाजी महाराजांचा विजय असो अशी घोषणा दिली जाते. तेव्हा शिवाजी महाराजांच्या तलवारीची धारही शत्रूंच्या मनात भीती निर्माण करते. अशावेळी शिंदे आणि त्यांचे बंडखोर आमदार मुंबईत यायला घाबरणार नाही तर काय होईल?

Subhash Desai : महाराष्ट्रात असते तर कोणत्याही बिळातून फरफटत आणलं असतं, 72 तास विमानतळाला घेराव घालू; सुभाष देसाईंचं थेट आव्हान
72 तास विमातळाला घेराव घालू; सुभाष देसाईंचं थेट आव्हानImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 1:06 PM

मुंबई: शिवसेना आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) लढाईने आता टोकाची भूमिका घेतली आहे. शाब्दिक चकमक, आरोप आणि धमक्या, ट्विटर वॉर, रस्त्यावरची लढाई आणि आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटात प्रचंड वितुष्ट आलं आहे. शिंदे गटातील आमदारा माघारी फिरणार नसल्याचं लक्षात आल्यानंतरच शिवसेना (shivsena) अधिक आक्रमक झाली आहे. आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई (subhash desai) यांनीही शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात असते तर कोणत्याही बिळातून पोलिसांनी त्यांना फरफटत आणलं असतं. म्हणूनच ते घाबरून गुवाहाटीला जाऊन बसले आहेत, असा हल्लाबोल सुभाष देसाई यांनी केला आहे. सुभाष देसाई यांनी पहिल्यांदाच बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच शिंदे गटातील आमदारांना देसाई यांनी धमकावलंही आहे.

गोरेगाव येथे उत्तर भारतीय कार्यकर्ता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुभाष देसाई बोलत होते. शिवसेना भवनात डाका टाकण्यात आला आहे. बंडखोर आमदार महाराष्ट्रात कोणत्याही बिळात असते तर पोलिसांनी त्यांना फरफटत आणलं असतं. त्यामुळेच ते घाबरून गुवाहाटीला जाऊन लपले आहेत. धमक्या देत आहेत. सत्ता परिवर्तनाचं स्वप्न पाहत आहेत, असा हल्लाबोल देसाई यांनी केला.

हे सुद्धा वाचा

त्यांना विमानतळावरून बाहेर पडू देणार नाही

ज्या दिवशी हे बंडखोर आमदार मुंबईत येतील तेव्हा ते शिवसेना भवनात दाखल होतील. इतरांना एअरपोर्टवरून बाहेर पडूच दिलं जाणार नाही. 72 तासांपेक्षा अधिक विमानतळाला घेरावा घालण्यात येईल, अशी धमकीच सुभाष देसाई यांनी दिली आहे.

शिंदे तोंडावर आपटतील

जेव्हा शिवाजी महाराजांचा विजय असो अशी घोषणा दिली जाते. तेव्हा शिवाजी महाराजांच्या तलवारीची धारही शत्रूंच्या मनात भीती निर्माण करते. अशावेळी शिंदे आणि त्यांचे बंडखोर आमदार मुंबईत यायला घाबरणार नाही तर काय होईल? असा सवाल त्यांनी केला. जेव्हा जेव्हा शिवसेनेविरोधात कुणी बंड केलं. त्या त्या वेळी त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. एकनाथ शिंदेही तोंडावर आपटतील, असा दावाही त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.