AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : कायद्याचा आणि घटनेचा पेच निर्माण झाल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, राष्ट्रपती राजवट लागू करा; राऊतांचा पुनरुच्चार

Sanjay Raut : संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळेच राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली आहे. राज्यात दोघांचंच मंत्रिमंडळ आहे. हे मंत्रिमंडळ कायदेशीर आहे नाही तो नंतरचा भाग.

Sanjay Raut : कायद्याचा आणि घटनेचा पेच निर्माण झाल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, राष्ट्रपती राजवट लागू करा; राऊतांचा पुनरुच्चार
कायद्याचा आणि घटनेचा पेच निर्माण झाल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला; राऊतांचा दावाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 17, 2022 | 10:55 AM
Share

नवी दिल्ली: पंधरा दिवस झाले तरी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यावरून शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकारवर टीका केली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कायद्याला धरून झालेलंच नाही. कायद्याला धरून झालं असतं तर आतापर्यंत या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता. पण तो झाला नाही. याचाच अर्थ कायद्याचा आणि घटनेचा काही तरी पेच निर्माण झाला आहे. नाही तर जे सरकार फक्त सत्तेसाठी निर्माण झालं आहे, जे आमदार केवळ मंत्रिपदासाठी फुटले आहेत ते इतके स्वस्थ का बसले असते? कारण त्यांना माहीत आहे. आपण शपथ घेतली तर आपली आमदारकी धोक्यात येईल आपलं सरकार धोक्यात येईल, म्हणूनच ते स्वस्थ आहेत, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळेच राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली आहे. राज्यात दोघांचंच मंत्रिमंडळ आहे. हे मंत्रिमंडळ कायदेशीर आहे नाही तो नंतरचा भाग. पण नैतिकता काय आहे? या सरकारला नैतिकता काय आहे? सुप्रीम कोर्टात खटला सुरू आहे, ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्रात राज्य नसावं, असं राऊत म्हणाले.

आम्हाला कायदा शिकवू नका

हे सरकार घटनेची पायमल्ली करून स्थापन झाले आहे. म्हणून आतपर्यंत त्यांनी मंत्रीमंडळ विस्तार केला नाही. त्यांना कायद्याचा धाक आहे, त्यामुळेच ते मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाहीयेत. आम्हाला संपूर्ण घटना माहीत आहे आणि या सरकारचे भविष्यात काय होणार हे माहीत आहे, आम्हाला कायदा शिकवू नका, असा पलटवार राऊत यांनी भाजपवर केला.

शिवसेना यूपीएसोबत

यावेळी त्यांनी उपराष्ट्रपतीपदाबाबतच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दुपारी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेनाही उपस्थित राहणार आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना यूपीएसोबत राहील असं सांगितलं जात आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.