AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : कायद्याचा आणि घटनेचा पेच निर्माण झाल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, राष्ट्रपती राजवट लागू करा; राऊतांचा पुनरुच्चार

Sanjay Raut : संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळेच राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली आहे. राज्यात दोघांचंच मंत्रिमंडळ आहे. हे मंत्रिमंडळ कायदेशीर आहे नाही तो नंतरचा भाग.

Sanjay Raut : कायद्याचा आणि घटनेचा पेच निर्माण झाल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, राष्ट्रपती राजवट लागू करा; राऊतांचा पुनरुच्चार
कायद्याचा आणि घटनेचा पेच निर्माण झाल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला; राऊतांचा दावाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 17, 2022 | 10:55 AM
Share

नवी दिल्ली: पंधरा दिवस झाले तरी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यावरून शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकारवर टीका केली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कायद्याला धरून झालेलंच नाही. कायद्याला धरून झालं असतं तर आतापर्यंत या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता. पण तो झाला नाही. याचाच अर्थ कायद्याचा आणि घटनेचा काही तरी पेच निर्माण झाला आहे. नाही तर जे सरकार फक्त सत्तेसाठी निर्माण झालं आहे, जे आमदार केवळ मंत्रिपदासाठी फुटले आहेत ते इतके स्वस्थ का बसले असते? कारण त्यांना माहीत आहे. आपण शपथ घेतली तर आपली आमदारकी धोक्यात येईल आपलं सरकार धोक्यात येईल, म्हणूनच ते स्वस्थ आहेत, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळेच राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली आहे. राज्यात दोघांचंच मंत्रिमंडळ आहे. हे मंत्रिमंडळ कायदेशीर आहे नाही तो नंतरचा भाग. पण नैतिकता काय आहे? या सरकारला नैतिकता काय आहे? सुप्रीम कोर्टात खटला सुरू आहे, ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्रात राज्य नसावं, असं राऊत म्हणाले.

आम्हाला कायदा शिकवू नका

हे सरकार घटनेची पायमल्ली करून स्थापन झाले आहे. म्हणून आतपर्यंत त्यांनी मंत्रीमंडळ विस्तार केला नाही. त्यांना कायद्याचा धाक आहे, त्यामुळेच ते मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाहीयेत. आम्हाला संपूर्ण घटना माहीत आहे आणि या सरकारचे भविष्यात काय होणार हे माहीत आहे, आम्हाला कायदा शिकवू नका, असा पलटवार राऊत यांनी भाजपवर केला.

शिवसेना यूपीएसोबत

यावेळी त्यांनी उपराष्ट्रपतीपदाबाबतच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दुपारी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेनाही उपस्थित राहणार आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना यूपीएसोबत राहील असं सांगितलं जात आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.