AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…तर मी सुद्धा मोदींच्या मदतीला धावून जाईन’, उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं वक्तव्य

"तेलंगणाचा आणि माझा काय संबंध आहे? मला कदाचित असं वाटतंय की, ही सगळी मोठी माणसं आहेत. मोदी वगैरे फार मोठी माणसं आहेत. त्यांना कुणीतरी मेसेज लिहून देणारा असतो, असं वाटतं. परत टेलिप्रॉम्पटर असतं. टेलिप्रॉम्पटर कुठे ठेवला असेल किंवा नसेल म्हणून ते काहीतरी बोलले असतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'...तर मी सुद्धा मोदींच्या मदतीला धावून जाईन', उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो
| Updated on: May 16, 2024 | 6:27 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध प्रश्नांवर मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी टीव्ही 9 नेटवर्कला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी एक भावनिक वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्यावर संकट आलं तर सर्वात आधी आपण धावून जावू, असं मोदी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपणही मोदींवर संकट उद्भवल्यास सर्वात आधी धावून जाऊ, असं वक्तव्य केलं.

“हे मला दाखवण्यापेक्षा तुम्ही त्यांना परत का दाखवत नाहीत? ते त्यांनाच दाखवा परत. कारण आता ते मला नकली संतान म्हणत आहेत. तेच झालंय ना… म्हणून मी या सरकारला गजनी सरकार म्हणतोय. 2014 ला काय म्हणाले होते ते त्यांना आठवत नाही. 2019 ला काय म्हणाले होते ते त्यांना आठवत नाही. त्यानंतर 2024 ला काल काय बोलले ते आज आठवत नाही. आज काय बोलले ते उद्या आठवत नाही. मी याबद्दल काय प्रतिक्रिया देणार? हा व्हिडीओच त्यांना परत दाखवाना”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मोदी वगैरे मोठी माणसं, त्यांना मेसेज लिहून देणारा…’

“बरं! कुठे भाषण करतोय त्याचं त्यांना भान नाही. तेलंगणात जाऊन मला नकली संतान म्हणत आहेत. तेलंगणाचा आणि माझा काय संबंध आहे? मला कदाचित असं वाटतंय की, ही सगळी मोठी माणसं आहेत. मोदी वगैरे फार मोठी माणसं आहेत. त्यांना कुणीतरी मेसेज लिहून देणारा असतो, असं वाटतं. परत टेलिप्रॉम्पटर असतं. टेलिप्रॉम्पटर कुठे ठेवला असेल किंवा नसेल म्हणून ते काहीतरी बोलले असतील. पण त्यांचं भाषण लिहिणाऱ्याला बहुतेक आता मानधन न मिळाल्यामुळे संपावर गेला असावा”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

नरेंद्र मोदी दोन-तीन गोष्ट बोललेले आहेत, जर काही झालं तर उद्धव ठाकरेंच्या मदतीला सर्वात आधी मी धावून जाईल, असं मोदी म्हणाले. त्यावर काय सांगाल? असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर ठाकरेंनी उत्तर दिलं. “मोदींनाही काही झालं तर मी धावून जाईन. त्यामध्ये काय, ही माणुसकी आहे. हेच तर आमचं हिंदुत्व आहे. ज्यावेळेला आमचा शिवसैनिक नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर पूर आला तर हे पूरग्रस्त मुसलमान आहेत, असं बघत नाहीत. ते स्वत:च्या जीवावर उधार होऊन नागरिकांना वाचवतात. यालाच माणुसकी म्हणतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे बाळासाहेबांचे विचार आहेत? ठाकरेंचा सवाल

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मोदींना किती माहिती आहे? महाराष्ट्र ज्याप्रकारे लुटत आहेत, मुंबईतील हिरे व्यापार ते गुजरातला घेऊन गेले. मुंबईतील आर्थिक केंद्र हे मी मुद्दामून सांगेन जे काँग्रेस सरकारने दिलं होतं, तिथे त्यांनी बुलेट ट्रेन आणल्या. हे बाळासाहेबांचे विचार आहेत? मुंबई आणि महाराष्ट्र कराच्या रुपयात एक रुपया केंद्राला देतो तेव्हा केंद्राकडून फक्त आठ आणे मिळतात. हे बाळासाहेबांचे विचार आहेत?”, असा सवाल ठाकरेंनी केला.

“आरेची कारशेडबद्दल मी बोलत होती की कांजुरमार्गला एक स्वतंत्र टर्मिनस होऊ शकतं. आरेच्या कारशेडमुळे पर्यावरणाची हानी केलेली आहे. हे बाळासाहेबांचे विचार आहेत का? मुंबईच्या एफडी तोडल्या. हे बाळासाहेबांचे विचार आहेत. मुंबईचं वैभव लुटत आहेत. मराठी माणसाला आमच्याकडे जागा नाही अशा तुमच्या गुजरातच्या कंपनी इकडे जाहिरात करत आहेत. हे बाळासाहेबांचे विचार आहेत का?”, असेदेखील प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केले.

बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारी शिवसेना एकनाथ शिंदेंची?

मोदींचं म्हणणं आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे. त्यावर काय म्हणाल? असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मोदींना बाळासाहेबांचे विचारच कळलेले नाहीत. त्यांना बाळासाहेबांचा हिंदुत्वच कळलेलं नाही. बाळासाहेबांनी प्रत्येक वेळेला इथे राहून जे पाकिस्तानचे स्वप्न बघत आहेत त्यांना विरोध केलेला आहे”, असं ठाकरे म्हणाले.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.