AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : ‘द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा दिलेल्यांचं स्वागतच’, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

आम्ही 50 लोकांनी तर आधीच पाठिंबा दिला होता. आता ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचं स्वागत सगळ्यांनीच केलेलं आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच काम पंतप्रधान मोदींनी केलंय. त्यांच्या भूमिकेचं स्वागत सर्वांनीच केलं आहे.

Eknath Shinde : 'द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा दिलेल्यांचं स्वागतच', उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 3:50 PM
Share

मुंबई : भाजप प्रणित एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तशी घोषणा केलीय. दरम्यान, आमचा पाठिंबा द्रौपदी मुर्मु यांना आहे, भाजपला नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. त्याबाबत आज माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विचारलं. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, ‘द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत. त्या आदिवासी महिला आहेत. यांना पाठिंबा दिलेल्यांचं स्वागत आहे. शिवसेनेच्या सर्व खासदारांची भूमिका हिच होती. आम्ही 50 लोकांनी तर आधीच पाठिंबा दिला होता. आता ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचं स्वागत सगळ्यांनीच केलेलं आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच काम पंतप्रधान मोदींनी केलंय. त्यांच्या भूमिकेचं स्वागत सर्वांनीच केलं आहे. आमचे दीपक केसरकर आज एनडीएच्या बैठकीला दिल्लीला गेले आहेत. त्यांना या बैठकीला बोलावलं होतं’.

‘आमच्या भूमिकेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद’

शिंदे पुढे म्हणाले की, आम्ही जी भूमिका घेतली आहे त्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय. आज उल्हासनगरचे 18 नगरसेवक आज इथे आले आहेत. नाशिक, दिंडोरी, नगर, राज्यभरातील नगरसेवक आणि लोक आमच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत. आमच्या भूमिकेचं स्वागत तिथेही सर्व नागरिकांनी केलंय. आज गुरुपौर्णिमा आहे. बाळासाहेब, दिघेसाहेब यांना वंदन केलं. त्यांनी दिलेली शिकवण आम्ही आचरणात आणू. हे सरकार सर्वसामान्य नागरिकाचं आहे. सर्वांना वाटलं पाहिजे हे सरकार आपलं आहे. मी मुख्यमंत्री असलो तरी जनतेचा सेवक म्हणूनच काम करणार आहे. या सरकारची वाटचाल ही सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवणारी असेल.

‘राज्याचा सर्वांगिण विकास हेच आमचं टार्गेट’

दरम्यान, शरद पवार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं आहे. त्याबाबत विचारलं असता, पवारसाहेब मोठे नेते आहेत. आम्ही त्यांचा नेहमीच आदर करतो. पण आज आमच्यासोबत 50 आमदार आहेत. तसंच अनेक नेते, पदाधिकारी, लोकं आमच्या भूमिकेसोबत आहेत. त्यामुळे आम्हाला बाकी राजकारण करायचं नाही. राज्याचा सर्वांगिण विकास हेच आमचं टार्गेट आहे, असं शिंदेंनी स्पष्ट केलंय.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.