AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेला सत्ता देऊ नका, त्यांना काही कळत नाही : शरद पवार

मुंबईकर शिवसेनेच्या (Sharad Pawar on Shivsena) नेत्यांना शेतातलं काही माहित नाही. त्यांच्याकडून शेती प्रश्न आणि उपाययोजना कशा होतील? असा सवाल शरद पवार यांनी केला.

शिवसेनेला सत्ता देऊ नका, त्यांना काही कळत नाही : शरद पवार
| Edited By: | Updated on: Oct 01, 2019 | 6:07 PM
Share

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Shivsena) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. शिवसेनेच्या हातात राज्य देऊ नका. त्यांना काहीही कळत नाही. मुंबईकर शिवसेनेच्या (Sharad Pawar on Shivsena) नेत्यांना शेतातलं काही माहित नाही. त्यांच्याकडून शेती प्रश्न आणि उपाययोजना कशा होतील? असा सवाल शरद पवार यांनी केला. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूममध्ये शरद पवार बोलत होते.

“एकदा मी मुंबई येथून शिवसेनेच्या नेत्यांसोबत येत असताना शेतात सोयाबीन दिसलं. त्यावेळी मी म्हणालो, सोयाबीन छान आहे. ते म्हणाले छान, कुठे आहे? शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांना सोयाबीन कुठे येते, शेंगा कुठे असतात ते माहित नाही, रताळे जमिनीत येतात की जमिनीच्या वर हेही माहीत नाही. त्यामुळे त्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही, त्यांच्या हातात सत्ता देऊ नका,” असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यावरुनही शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. पवारांची बदनामी केल्याशिवाय राज्य टिकेल असं वाटत नाही. त्यामुळे 70 जणांची नावे राज्य बँकेच्या प्रकरणात असताना फक्त पवारांची चर्चा होते. खुशाल गुन्हा दाखल करा, मी चिंता करत नाही, असंही पवार म्हणाले.

मोठ्या बँकातून व्यापाऱ्यांनी काढलेल्या कर्जाचे 90 हजार कोटी उद्योजकांनी बुडविले, केंद्र सरकारने ही रक्कम भरली. व्यापाऱ्यांचे पैसे सरकार भरते, सवलत देते, मात्र शेतकऱ्यांना मदत करत नाही, असा आरोप पवारांनी केला.

आशिष शेलारांचा पवारांवर हल्लाबोल

शालेय शिक्षण मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी पवार कुटुंबीयांवर तुफान हल्ला चढवला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेलार यांनी राज्य सहकारी बँक घोटाळ्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांना लक्ष्य केलं.

शेलार म्हणाले, “गेल्या काही दिवसात एका कुटुंबाचं नाट्य समोर आलं. 11 हजार कोटींच्या राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटींचा घोटाळा कसा असं अजितदादा म्हणाले. या आकड्यांची स्पष्टता देण्यासाठी म्हणून मी आकडेवारी देतो. हे म्हणाले अजितदादा यांचं नाव होतं म्हणून गुन्हा दाखल झाला. पण खरं तर कर्ज समितीचे सदस्य म्हणून 8 वेळा कोर्टाने त्यांचं नाव घेतलं आहे”.

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.