राहुल गांधींनी राऊतांना विचारलं, एका वाक्यात शिवसेना काय ते सांगा? आणि राऊतांनी थेट उत्तर दिलं

आपण राहुल गांधी यांना शिवसेना म्हणजे काय? शिवसेना नेमकी कशी काम करते? याबाबत एका वाक्यात सांगितल्याचं राऊतांनी म्हटलंय. 'फटे लेकीन हटे नही' हे शिवसेनेचं धोरण असल्याचं आपण राहुल गांधींना सांगितल्याचं राऊत म्हणाले. त्यावेळी उपस्थितांमध्येही एकच हशा पिकला.

राहुल गांधींनी राऊतांना विचारलं, एका वाक्यात शिवसेना काय ते सांगा? आणि राऊतांनी थेट उत्तर दिलं
संजय राऊत, राहुल गांधी (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 8:21 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मधल्या काळात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चाही झाली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या भेटीबाबत अधिक माहिती दिली आहे. आपण राहुल गांधी यांना शिवसेना म्हणजे काय? शिवसेना नेमकी कशी काम करते? याबाबत एका वाक्यात सांगितल्याचं राऊतांनी म्हटलंय. ‘फटे लेकीन हटे नही’ हे शिवसेनेचं धोरण असल्याचं आपण राहुल गांधींना सांगितल्याचं राऊत म्हणाले. त्यावेळी उपस्थितांमध्येही एकच हशा पिकला. (What is ShivSena? MP Sanjay Raut told Rahul Gandhi in one sentence)

‘मध्यंतरी माझी आणि राहुल गांधी यांची भेट झाली. या भेटीची खूप चर्चा झाली. राहुल गांधी यांनी शिवसेनेच्या रचनेविषयी कार्याविषयी समजून घेतलं. त्यांनी मला एका वाक्यात शिवसेना काय आहे, असं विचारलं. त्याला उत्तर म्हणून आम्ही असे आहोत की एकदा रस्त्यावर उतरलो की विचार करत नाही. ‘फटे लेकीन हटे नही’ असं आमचं असतं. आम्ही कुणाच्या पाठीत वार करत नाही,” असं राऊत म्हणाले. तसंच शिवसेना असंख्य वार आणि घाव घेऊन इथपर्यंत आली आहे. ही शिवसेना त्यागातून संघर्षातून समोर आलेली आहे. जी आंदोलनं आपण केली त्याच पुण्याईवर आज शिवसेना उभी असल्याचंही राऊत यावेळी म्हणाले.

चंद्रकांत पाटलांना टोला

मला माजी मंत्री म्हणू नका, आगामी दोन तीन दिवसांत कळेल असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना तुम्ही पुढील पंचवीस वर्षे माजी मंत्रीच राहणार असं थेट फोन करुन सांगितलं आहे. संजय राऊतांनी फोन करुनच चंद्रकांत पाटलांना त्यांच्या कोड्यात टाकणाऱ्या वक्तव्याला उत्तर दिल्यामुळे एकच चर्चा रंगली आहे.

‘कुबड्या’शिवाय सरकार स्थापन करायचं आहे- राऊत

बाळासाहेबांचं स्वप्न होतं की शिवसेनेचा प्रसार देशभर व्हावा. राज्याचे मुख्यमंत्री देशात पहिल्या पाचमध्ये आले. पण आपल्याला शिवसेनेला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे. आपल्याला 150 जागा जिंकणं गरजेचं आहे. कुणाच्याही कुबड्या शिवाय सरकार स्थापन करायचं आहे. काहीच नसलेल्या भाजपला 105 जागा मिळतात. आता स्वबळावर सत्ता हवी तर शिवसेनेला 150 जागा हव्यात, असेही राऊत म्हणाले.

ऑगस्टमध्ये राऊत- राहुल गांधी भेट, तेव्हा नेमकं काय घडलं?

जुलैमध्ये राहुल गांधी यांनी विरोधकांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला संजय राऊत गेले होते. त्यानंतर 2 ऑगस्ट रोजी संजय राऊत आणि राहुल गांधी यांची भेट झाल्याचं वृत्त होतं. राहुल यांनी आपल्याकडून शिवसेनेची कार्यप्रणाली समजून घेतल्याचं ट्विटच राऊत यांनी केलं होतं. तसंच 3 ऑगस्टच्या बैठकीलाही संजय राऊत हे राहुल यांच्या शेजारीच बसले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील घनिष्ट मैत्रीची चर्चा होत आहे. त्यानंतर या दोन्ही नेत्यांचा फोटो व्हायरल झाल्याने या दोन्ही नेत्यांच्या मैत्रीच्या चर्चेला उधाण आलं आहे.

इतर बातम्या :

चंद्रकांत पाटील म्हणाले माजी मंत्री म्हणू नका, राऊत म्हणाले मी थेट त्यांना फोनच केला, पण नेमकं काय उत्तर दिलं?

‘आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल’, चंद्रकांत दादांचा सावधगिरीचा इशारा

What is ShivSena? MP Sanjay Raut told Rahul Gandhi in one sentence

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.