AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“संजय राऊत चार वेळा खासदार झाले, तेही एकाच पक्षातून, तुम्हाला त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही”

MLA Vaibhav Naik on Nitesh Rane : नितेश राणे यांच्या टीकेला ठाकरे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले...

संजय राऊत चार वेळा खासदार झाले, तेही एकाच पक्षातून, तुम्हाला त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 22, 2023 | 4:50 PM
Share

सिंधुदुर्ग : भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्याला आता ठाकरे गटाच्या वतीने उत्तर देण्यात आलं आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. संजय राऊत नवीन संसदेची पायरी चढणार नाही, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे. यावर बोलताना यावर बोलताना वैभव नाईक यांनी, संजय राऊत आतापर्यंत चार वेळा खासदार झाले. तेही एकाच पक्षातून खासदार झाले.मात्र राणे कुटुंबीय वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी झाले, असं वैभव नाईक म्हणाले.

भाजपला आपल्याविरोधात बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याची खुमखुमी आहे. ईडीला सगळेच सामोरे गेले. मात्र ईडीच्या भीतीने राणे भाजपमध्ये गेले. त्यामुळे नितेश राणेंना कर नाही त्याला डर कसला हे बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका वैभव नाईक यांनी केलीय.

अधिकृत जागा वाटपावरून आघाडीत अजूनही चर्चा नसताना नितेश राणे त्यावर बोलतात. मात्र 2019 ला नितेश राणेंचा स्वाभिमान पक्षाला कोणी विचारलं नाही. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला डमेज करण्यासाठी बंडखोर उमेदवार अनेक ठिकाणी उभे केले. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आमचे तिन्ही पक्ष मैदानात आहेत, असं वैभव नाईक म्हणालेत.

जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवर म्हणाले…

निष्कलंक असलेल्या जयंत पाटील यांच्यावर अश्या प्रकारे ईडीच्या नोटिसा पाठवून त्रास दिला जात आहे. मात्र त्यांच्या सोबत असलेल्या जनता रस्त्यावर उतरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. त्या भावना नितेश राणेंना समजणार नाहीत, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांच्या ईडीच्या चौकशी संदर्भात वैभव नाईक यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मातोश्री दोन बांधलं. मात्र बाळासाहेबांचं स्मारक बाधू शकले नाहीत, अशी बोचरी टीका नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली. यावर वैभव नाईक यांनी बाळासाहेबांच्या स्मारक संदर्भात सर्व बाबी पूर्ण झाल्या आहेत. लवकरच बाळासाहेबांचं भव्य दिव्य स्मारक बांधण्यात येणार आहे, असं वैभव नाईक म्हणालेत.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...