AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तासंघर्षाच्या सुप्रीम सुनावणीआधी घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात, ‘हे’ 3 प्रश्न सोडवले, तर आणि तरच गुंता सुटेल!

घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केलेले ते तीन प्रश्न नेमके कोणते? त्यांची उत्तरं शोधली तर खरंच गुंता सुटेल?

सत्तासंघर्षाच्या सुप्रीम सुनावणीआधी घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात, 'हे' 3 प्रश्न सोडवले, तर आणि तरच गुंता सुटेल!
उल्हास बापट यांचं महत्त्वाचं विधानImage Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Sep 27, 2022 | 10:05 AM
Share

पुणे : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) पेच सोडवायचा असेल, तर मुलभूत तीन प्रश्न सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) सोडवावे लागतील. हे तीन प्रश्न सोडवल्यास राजकीय गुंता सोडवणं, जास्त सोप्प जाईल, असं मत त्यांनी  व्यक्त केला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीआधी उल्हास बापट टीव्ही 9 मराठीच्या लाईव्ह कार्यक्रमात बोलत होते.

उल्हास बापट यांनी एकूण तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. ते प्रश्न खालीलप्रमाणे –

  • 1. राज्यपालांचे अधिकार आणि तारतम्य काय?
  • 2. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय?
  • 3. पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देश काय? हे नीट सुस्पष्ट करण्याची गरज! या कायद्याचा दुरुपयोग होत असेल तर काय?

उल्हास बापट यांनी म्हटल्यानंतर या तीन प्रश्नांचा विचार सुप्रीम कोर्टाला निकाल देताना करावा लागणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर जो काही निर्णय सुप्रीम कोर्ट देईल, तो निर्णय लोकशाहीवर दूरगामी परिणाम करणारा असणार आहे, असंही बापट यांनी म्हटलंय.

पाहा व्हिडीओ : उल्हास बापट नेमकं काय म्हणाले?

राज्यपालांनी अनेकदा घटनेशी विसंगत असल्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशन बोलावताना काही संकेत पाळायचे असतात, ते कितपत पाळले गेले, यावरुनही उल्हास बापट यांनी लक्ष वेधलं. शिवाय विधानसभा अध्यक्षांचा हटवण्यासाठीच्या प्रक्रियेवरही त्यांनी यावेळी बोट ठेवलं.

अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे देशात पक्षांतर बंदी कायदा हा राजकीय लाभासाठी या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांना जरब बसवी म्हणून आणण्यात आला होता. पण आता याच कायद्याचा गैरवापर राजकीय फायद्यासाठी होत असेल, तर त्याचं काय? असा सवालही बापट यांनी विचारला. इतकंच नाही तर पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देशही सुप्रीम कोर्टाने नीट सुस्पष्ट करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

सुप्रीम कोर्टात नेमके कोणते प्रश्न प्रलंबित?

  • 16 आमदार अपात्र होणार का?
  • शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचं?
  • विधानसभेच्या उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्तावाचं काय?
  • राज्यपालांची भूमिका संशयास्पद होती?
  • निवडणूक आयोगाला कारवाई करण्यासाठी हिरवा कंदील की स्थगिती?

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत