AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वापर फक्त…. सुषमा अंधारे यांचा भाजपवर घणाघाती आरोप

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काड्या करण्यात आणि 40 बाहुल्यांचा सूत्रे हलवण्यात व्यस्त असल्याचेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वापर फक्त.... सुषमा अंधारे यांचा भाजपवर घणाघाती आरोप
Image Credit source: tv9
| Updated on: Oct 27, 2022 | 4:27 PM
Share

मुंबई : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत सुषमा अंधारे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांचा भाजप कडून टूल म्हणून वापर होत असल्याची घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काड्या करण्यात आणि 40 बाहुल्यांचा सूत्रे हलवण्यात व्यस्त असल्याचेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

नोटांवरुन देखील चांगलच राजकारण तापलं आहे. यावर देखील सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. भाजप नेते राम कदम यांनी नोटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्याची मागणी केली आहे.

नशीब आमदार राम कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही. अंध भक्ती किती असावी याचे हे उदाहरण आहे असं म्हणत सुषमा अंधारे यांनी राम कदम यांची खिल्ली उडवली.

चलनी नोटांवरून जाती जातीत भांडणे लावण्याचा प्रकार आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरु आहे. या पेक्षा आंतर राष्ट्रीय बाजारात चलनाची पत घसरली आहे. ती कशी सुधारावी याचा विचार करावा. आंतरराष्ट्रीय ताकत होती. ती कुठे आहे असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

आनंदाच्या शिधा वरून आनंद दिघे यांचा फोटो गायब आहे. एकनाथ शिंदे कुणाचे वारसदार आहेत. मोदींचा फोटो लावला पण बाळासाहेबांचा नाही अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

राणे पिता पुत्र सैराट प्रमाणे सुटले आहेत . पण कारवाई काही होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऐकनाथ शिंदे झाले आहेत. भाजप हे जाणून बुजून राज्यात एक संदेश देते की मराठा मुख्यमंत्री आहेत. त्यांना बुद्ध्यांक कमी आहे. असे दाखवले जात आहे.

सरकार कडून ओला दुष्काळ जाहीर होत नाही. विमा कंपन्यांना कोणाचा वरदहस्त आहे. की या कंपन्या निर्ढावल्या आहेत. 531 कोटी शेतकऱ्यांना कधी मिळतील असी सवालही अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.