AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयोगाच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील आज कोणते मुद्दे मांडणार? ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई म्हणाले…

केंद्रीय निवडणूक आयोगात आज ठाकरे गटाला बाजू मांडण्याची संधी मिळणार असून त्यात महत्वाचे दोन मुद्दे मांडले जाणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी म्हंटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील आज कोणते मुद्दे मांडणार? ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई म्हणाले...
Image Credit source: Google
| Updated on: Jan 20, 2023 | 1:44 PM
Share

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा मुद्दा निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुनावणीतच अडकून पडला आहे. दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बाजू मांडली जाणार आहे. कपिल सिब्बल हे ठाकरे गटाचे वकील असून ते ठाकरे गटाकडून युक्तिवाद करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी आजच्या सुनावणीत कोणते मुद्दे मांडले जाणार असल्याचे सांगितले आहे. अनिल देसाई म्हणाले आमची तयारी पूर्ण झाली आहे. कपिल सिब्बल हे आमच्या वतीने बाजू मांडतील यावर आमचं एकच म्हणणं आहे योग्य न्याय हवा आहे. पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत नीट न्याय व्हावा. पक्षप्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणी यावर निर्णय व्हावा असे दोन अर्ज निवडणूक आयोगाला दिले आहे. त्यावर निवडणूक आयोगाने निर्णय द्यावा असं अनिल देसाई म्हणाले.

याशिवाय अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी मैदानावरील एका विधानाचा संदर्भही दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींचाच माणूस असल्याचा किस्सा सांगितला होता.

त्यावर अनिल देसाई यांनी सुप्रीम कोर्टाने आणि निवडणूक आयोगाने अशा विधानांची नोंद घ्यायची असते, आणि त्यानुसार निर्णय द्यायचा असतो. पक्षातील वाद हा एक मुद्दा असू शकतो.

मी कुणाचा माणूस आहे ? हे जार त्यांनी सांगितले आहे तर त्यांना राजकीय संदर्भ द्यायचा होता आणि ते कुणाचे होते हे समोर आले आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयात हे मुद्दे येतील असं वाटतंय असेही देसाई म्हणाले आहे.

सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयात अनेक संदर्भ असतात तसे सुमोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा संदर्भ निकालात येईल असेही अनिल देसाई यांनी म्हंटले आहे.

एकूणच आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे होणाऱ्या सुनावणीत ठाकरे गट बाजू मांडणार असून निकाल त्यांच्या बाजूने लागेल अशी त्यांना अपेक्षा असून सुनावणीत काय घडतं याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...