AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule: जनेतेचे प्रश्न थेट लोकसभेमध्ये..! काय आहे सुप्रिया सुळेंचा अनोखा फंडा?

हा अभिनव उपक्रम राबविण्यामागे काय कारण याचा उलगडा देखील खा. सुप्रिया सुळे यांनी केला आहे. जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणूनच जनता आपल्याला निवडून देते. प्रत्येकाशी संवाद साधणे शक्य नसले तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून हे शक्य आहे. जनतेचा सहभाग यात वाढला पाहिजे या विचाराने हा एक नवीन उपक्रम सुरु केला आहे.

Supriya Sule: जनेतेचे प्रश्न थेट लोकसभेमध्ये..! काय आहे सुप्रिया सुळेंचा अनोखा फंडा?
खा. सुप्रिया सुळे
| Updated on: Jul 07, 2022 | 5:30 PM
Share

मुंबई : दिवसेंदिवस (Social Media) सोशल मिडियाचा वापर हा वाढत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच (Supriya Sule) खा. सुप्रिया सुळे यादेखील सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असल्याचा प्रत्यय अनेकवेळा आला आहे. आता याच सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आपले प्रश्न थेट (Loksabha) लोकसभेत मांडता यावेत असा फंडा सुळेंचा राहणार आहे. जनसामान्यांनी विचारलेले प्रश्न लोकसभेत मांडता यावेत यासाठी त्यांनी ‘आस्क मी डॉट सुप्रिया सुळे डॉट नेट’ ही वेबसाईट सुरु केली आहे. एका क्लिकवर नागरिक आपले प्रश्न हे त्यांच्यापर्यंत पाठविता येणार आहेत. तर त्यानंतर हेच प्रश्न त्या लोकसभेत उपस्थित करणार आहेत.

नेमकी कशी असणार प्रक्रिया?

जनतेचे प्रश्न लोकसभेत मांडताना जनतेचा सहभाग आणखी वाढावा यासाठी त्यांनी ‘सक्रिय सहभाग आणि संवाद’ हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत नागरिक आपले प्रश्न, विषय, सुचना ‘आस्क मी डॉट सुप्रिया सुळे डॉट नेट’ ( https://askme.supriyasule.net ) या वेबसाईटवरुन थेट सुळे यांच्यापर्यंत पाठवू शकतात. वेबसाइट ओपन केल्यानंतर नागरिकांना एक फाॅर्म भरावा लागेल. फाॅर्ममध्ये आपली माहिती आणि प्रश्न सविस्तर लिहिल्यानंतर प्रश्न पाठवता येणार आहे. त्यांतर तो प्रश्न खा. सुळे यांच्यापर्यंत पोहोचल्याचा एक एसएमएस देखील नागरिकांना मिळणार आहे. वाढती महागाई आणि सर्वसामान्यांची अवस्था काय झाली आहे. हे केंद्राच्या निदर्शानास आणून देण्याच्या अनुशंगाने हा उपक्रम राबवला जाणार आहे.

…म्हणून हा अभिनव उपक्रम सुरु

हा अभिनव उपक्रम राबविण्यामागे काय कारण याचा उलगडा देखील खा. सुप्रिया सुळे यांनी केला आहे. जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणूनच जनता आपल्याला निवडून देते. प्रत्येकाशी संवाद साधणे शक्य नसले तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून हे शक्य आहे. जनतेचा सहभाग यात वाढला पाहिजे या विचाराने हा एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. यात स्वयंसेवी संस्था, नागरिक त्यांचे प्रश्न विचारू शकतात. त्यातील महत्त्वाचे मुद्दे, सुचना, विषय मी संसदेत मांडण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यामुळे नागरिकांनी आपले प्रश्न मांडावेत शिवाय या संवादाला आणखी मजबूत करण्यासाठी नागरिकांच्या अन्य काही सुचना असतील तर त्यांचेही स्वागत आहे”.असेही सुप्रिया सुळे ह्या म्हणाल्या आहेत.

देशातील पहिलाच असा अभिनव उपक्रम

जनतेचे प्रश्न थेट लोकसभेत असा हा पहिलाच उपक्रम असणार आहे. शिवाय यामध्ये सहभागी होण्याची प्रक्रियाही सोपी असून सोशल मिडियाचा वाढता वापर यामुळे त्यांनी ही संकल्पना राबवली आहे. लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या व्यापक जनसंवादाला यामुळे चालना मिळणार आहे. या उपक्रमासाठी सहकार्य मिळेल असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.