AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule: जनेतेचे प्रश्न थेट लोकसभेमध्ये..! काय आहे सुप्रिया सुळेंचा अनोखा फंडा?

हा अभिनव उपक्रम राबविण्यामागे काय कारण याचा उलगडा देखील खा. सुप्रिया सुळे यांनी केला आहे. जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणूनच जनता आपल्याला निवडून देते. प्रत्येकाशी संवाद साधणे शक्य नसले तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून हे शक्य आहे. जनतेचा सहभाग यात वाढला पाहिजे या विचाराने हा एक नवीन उपक्रम सुरु केला आहे.

Supriya Sule: जनेतेचे प्रश्न थेट लोकसभेमध्ये..! काय आहे सुप्रिया सुळेंचा अनोखा फंडा?
खा. सुप्रिया सुळे
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 07, 2022 | 5:30 PM
Share

मुंबई : दिवसेंदिवस (Social Media) सोशल मिडियाचा वापर हा वाढत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच (Supriya Sule) खा. सुप्रिया सुळे यादेखील सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असल्याचा प्रत्यय अनेकवेळा आला आहे. आता याच सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आपले प्रश्न थेट (Loksabha) लोकसभेत मांडता यावेत असा फंडा सुळेंचा राहणार आहे. जनसामान्यांनी विचारलेले प्रश्न लोकसभेत मांडता यावेत यासाठी त्यांनी ‘आस्क मी डॉट सुप्रिया सुळे डॉट नेट’ ही वेबसाईट सुरु केली आहे. एका क्लिकवर नागरिक आपले प्रश्न हे त्यांच्यापर्यंत पाठविता येणार आहेत. तर त्यानंतर हेच प्रश्न त्या लोकसभेत उपस्थित करणार आहेत.

नेमकी कशी असणार प्रक्रिया?

जनतेचे प्रश्न लोकसभेत मांडताना जनतेचा सहभाग आणखी वाढावा यासाठी त्यांनी ‘सक्रिय सहभाग आणि संवाद’ हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत नागरिक आपले प्रश्न, विषय, सुचना ‘आस्क मी डॉट सुप्रिया सुळे डॉट नेट’ ( https://askme.supriyasule.net ) या वेबसाईटवरुन थेट सुळे यांच्यापर्यंत पाठवू शकतात. वेबसाइट ओपन केल्यानंतर नागरिकांना एक फाॅर्म भरावा लागेल. फाॅर्ममध्ये आपली माहिती आणि प्रश्न सविस्तर लिहिल्यानंतर प्रश्न पाठवता येणार आहे. त्यांतर तो प्रश्न खा. सुळे यांच्यापर्यंत पोहोचल्याचा एक एसएमएस देखील नागरिकांना मिळणार आहे. वाढती महागाई आणि सर्वसामान्यांची अवस्था काय झाली आहे. हे केंद्राच्या निदर्शानास आणून देण्याच्या अनुशंगाने हा उपक्रम राबवला जाणार आहे.

…म्हणून हा अभिनव उपक्रम सुरु

हा अभिनव उपक्रम राबविण्यामागे काय कारण याचा उलगडा देखील खा. सुप्रिया सुळे यांनी केला आहे. जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणूनच जनता आपल्याला निवडून देते. प्रत्येकाशी संवाद साधणे शक्य नसले तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून हे शक्य आहे. जनतेचा सहभाग यात वाढला पाहिजे या विचाराने हा एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. यात स्वयंसेवी संस्था, नागरिक त्यांचे प्रश्न विचारू शकतात. त्यातील महत्त्वाचे मुद्दे, सुचना, विषय मी संसदेत मांडण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यामुळे नागरिकांनी आपले प्रश्न मांडावेत शिवाय या संवादाला आणखी मजबूत करण्यासाठी नागरिकांच्या अन्य काही सुचना असतील तर त्यांचेही स्वागत आहे”.असेही सुप्रिया सुळे ह्या म्हणाल्या आहेत.

देशातील पहिलाच असा अभिनव उपक्रम

जनतेचे प्रश्न थेट लोकसभेत असा हा पहिलाच उपक्रम असणार आहे. शिवाय यामध्ये सहभागी होण्याची प्रक्रियाही सोपी असून सोशल मिडियाचा वाढता वापर यामुळे त्यांनी ही संकल्पना राबवली आहे. लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या व्यापक जनसंवादाला यामुळे चालना मिळणार आहे. या उपक्रमासाठी सहकार्य मिळेल असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!