AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्णव गोस्वामींच्या जीवाला धोका असल्यामुळे राज्यपालांना गृहमंत्र्यांशी बोलावे लागले: राम कदम

अर्णव गोस्वामी यांना तुरुंगात योग्यप्रकारे वागणूक देण्यात यावी. | Ram Kadam

अर्णव गोस्वामींच्या जीवाला धोका असल्यामुळे राज्यपालांना गृहमंत्र्यांशी बोलावे लागले: राम कदम
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 09, 2020 | 2:56 PM
Share

नवी मुंबई: रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami ) यांच्या जीवाला धोका असल्यामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करावा लागला. राज्यपालांना अशाप्रकारे राज्याच्या गृहमंत्र्यांना फोन करावा लागतो, हा महाराष्ट्र सरकारचा नाकर्तेपणा आहे, अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली. (Ram Kadam slams Maharashtra govt over Arnab Goswami arrest)

अर्णव गोस्वामी यांच्या सुटकेसाठी गेल्या काही दिवसांत राम कदम यांनी उपोषणापासून ते पदयात्रा असे सर्व उपाय करुन पाहिले आहेत. अखेर आज राम कदम नवी मुंबईच्या तळोजा येथील कारागृहात अर्णव गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना ही भेट नाकारण्यात आली. यानंतर राम कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी तळोजा तुरुंगात कारागृह अधीक्षकांची भेट घेतली. अर्णव गोस्वामी यांना तुरुंगात योग्यप्रकारे वागणूक देण्यात यावी. कायदा हातात घेतला जाणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे मानवाधिकारांचे उल्लंघन होता कामा नये, असे मी तुरुंग प्रशासनाला सांगितले.

अर्णव गोस्वामी यांच्या केसालाही धक्का लागला तर जनता त्यांच्या पाठिशी आहे. हे सरकार पत्रकारांचा गळा दाबू शकत नाही. हे सरकार मला अर्णव गोस्वामी यांना भेटून देत नाही तर मग सामान्य जनतेचे काय, असा सवाल यावेळी राम कदम यांनी उपस्थित केला.

अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यापासून भाजप नेते त्यांना जामीन देण्याची सातत्याने मागणी करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेटही घेतली होती. यानंतर आज लगेचच राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चाही केली.

त्यावेळी अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत राज्यपालांनी चिंता व्यक्त केली. अर्णव गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटून दिले जावे, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, अर्णव गोस्वामी यांच्या घरात ज्याप्रकारे पोलिसांचा फौजफाटा शिरला आणि त्यांना अटक करण्यात आली, याविषयीही राज्यपालांनी गृहमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

संबंधित बातम्या:

राज्यपालांनी अर्णव गोस्वामींची चिंता करु नये, सरकार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतेय: भुजबळ

मी अर्णव गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवून दाखवा; राम कदमांचे खुले आव्हान

(Ram Kadam slams Maharashtra govt over Arnab Goswami arrest)

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत