AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : मतदानाचे तीन टप्पे होताच शरद पवारांच इंडिया आघाडीच्या पंतप्रधान उमेदवाराबद्दल भाष्य

Sharad Pawar : शरद पवार सध्या इंडिया आघाडीमध्ये आहेत. या आघाडीने नरेंद्र मोदींसमोर पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. देशात तीन टप्प्यांच मतदान झालय. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधानपदाबद्दल महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. 1977 साली जनता पार्टीच सरकार सत्तेवर आलं, त्यावेळ सारखी स्थिती असल्याच पवार म्हणाले.

Sharad Pawar : मतदानाचे तीन टप्पे होताच शरद पवारांच इंडिया आघाडीच्या पंतप्रधान उमेदवाराबद्दल भाष्य
शरद पवारImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 08, 2024 | 11:23 AM
Share

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे. आतापर्यंत तीन टप्प्याच मतदान पार पडलय. अजून चार टप्पे बाकी आहेत. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडी असा सामना आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यापासून रोखण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन झालीय. सुरुवातीला इंडिया आघाडीत अनेक पक्ष होते. पण निवडणुका जवळ आल्यानंतर जनता दल युनायटेड आणि तृणमुल काँग्रेस सारखे मोठे पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडले. राजकीय हवा बदलल्यानंतर हे पक्ष इंडिया आघाडीत पुन्हा सामील होऊ शकतात. सध्या पंतप्रधान मोदींना अश्वमेध रोखणं हेच इंडिया आघाडीसमोरच लक्ष्य आहे. NDA आघाडीकडून नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात आहे. इंडिया आघाडीमध्ये मात्र पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरलेला नाही. इंडियन एक्सप्रेसला त्यांनी मुलाखत दिली.

इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा होते. काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव पंतप्रधानपदाठी पुढे आलेलं. त्यानंतर ही चर्चा थांबली. आता इंडिया आघाडीत असलेले दिग्गज नेते शरद पवार यांनी प्रथमच पंतप्रधानपदाबद्दल अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे. शरद पवार म्हणाले की, “1977 च्या जवळपास जाणारी स्थिती आहे. त्यावेळी जनता पार्टी स्थापन झालेली. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेस विरोधी पक्ष एकत्र आले होते व त्यांनी जनता पार्टीची स्थापना केलेली पुढे त्यांनी देशात सरकारही बनवलं” त्यावेळी सुद्धा आतासारखच पंतप्रधानपदाचा उमेदवार विरोधी पक्षांनी ठरवलेला नव्हता. जनता पार्टीमध्ये विलीन झालेल्या विविध पक्षीय खासदारांशी बोलल्यानंतर जयप्रकाश नारायण आणि जेबी क्रिपालानी यांनी मोरारजी देसाई यांचं नाव पंतप्रधान म्हणून जाहीर केलं होतं.

इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाबद्दल शरद पवार काय बोलले?

“1977 साली मोरारजी देसाई यांना जी मान्यता होती, त्यापेक्षा आज राहुल गांधी यांची स्वीकृती जास्त आहे” असं शरद पवार म्हणाले. ठस्वत:च्या पक्षात त्यांना भक्कम समर्थन आहे. आम्हा प्रादेशिक पक्षासोबत राहुल गांधींनी चांगला संवाद ठेवलाय” असही पवार म्हणाले. राहुल गांधींनी मला कॉल केला होता, तेव्हा अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर आम्ही गंभीर चर्चा केल्याच शरद पवार म्हणाले. मोरारजी देसाई यांची अशी कार्यपद्धती नव्हती असं पवार म्हणाले. शरद पवार यांनी राहुल गांधींच भरभरुन कौतुक केलय. पंतप्रधानपदाचे दाखले देऊन अप्रत्यक्षपणे शरद पवारांनी पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींच समर्थन केलय.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.