AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravikant Tupkar : मंत्रिमंडाळाच्या विस्तारासाठी मोर्चे काढण्याची वेळ आणू नका, तुपकरांचा नव्या सरकारला इशारा

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन 36 दिवस उलटून गेले तरी देखील अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. ही खेदजनक बाब असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.

Ravikant Tupkar : मंत्रिमंडाळाच्या विस्तारासाठी मोर्चे काढण्याची वेळ आणू नका, तुपकरांचा नव्या सरकारला इशारा
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 07, 2022 | 9:11 AM
Share

बुलडाणा : राज्यात नवे सरकार आले.  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असून, सध्या दोनच मंत्री राज्याचा कारभार पहात आहेत. त्यामुळे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्लीवाऱ्या सुरूच आहेत. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे विरोधकांकडून नव्या सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यानंतर आता स्वामिभानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी देखील निशाणा साधला आहे.  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन 36 दिवस उलटून गेले तरी देखील अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही ही खेदजनक बाब आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आम्हाला मोर्चे काढायला लावू नका असा इशारा देखील तुपकर यांनी यावेळी दिला आहे.

काय म्हणाले तुपकर

मुख्यमंत्री आणि   उपमुख्यमंत्र्यांनी  शपथ घेऊन 36 दिवस उलटून गेलेत, मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. ही खेदजनक बाब आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आम्हाला मोर्चा काढायला लावू नका. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की तात्काळ मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, दोघांच्या कॅबिनेटने जसे शहरांच्या नामकरणाबाबत तातडीने निर्णय घेतले, तसेच निर्णय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शेतकऱ्यांसाठी घेण्यात यावेत.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट मदत करावी अशी मागणी तुपकर यांनी केली आहे.

अजित पवार यांचीही टीका

दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने नव्या सरकारवर टीका केली आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाले आहे. विदर्भात तर गंभीर परिस्थिती आहे. पुराचे पाणी शेतात घुसून हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये तातडीने नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना मदतीची गरज असल्याचे पवार यांनी म्हटले होते. मात्र राज्यात सध्या दोनच मंत्री असल्यामुळे कामाला मर्यादा येते. त्यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडाळाचा विस्तार केला जावा असं अजित पवार यांनी आपल्या गडचिरोली दौऱ्यादरम्यान म्हटले होते.

Follow Us
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा.
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात...
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात....
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज.
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा.
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.