राजे, सरदार कितीही गेले तरी राष्ट्रवादी तरेल : धनंजय मुंडे

राजे, सरदार कितीही गेले तरी सामान्य माणसांच्या जीवावर राष्ट्रवादी काँग्रेस तरेल. पवारसाहेबांनी इतका जीव लावूनही ते पक्ष सोडत असतील तर प्रवेश दुर्दैवी आहे, असंही धनंजय मुंडे (Dhananjay Munde on Udayanraje) म्हणाले.

राजे, सरदार कितीही गेले तरी राष्ट्रवादी तरेल : धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Sep 13, 2019 | 3:50 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde on Udayanraje) यांनी टीका केली आहे. उदयनराजे यांनी पक्ष का सोडला हेच कळत नाही. पण राजे, सरदार कितीही गेले तरी सामान्य माणसांच्या जीवावर राष्ट्रवादी काँग्रेस तरेल. पवारसाहेबांनी इतका जीव लावूनही ते पक्ष सोडत असतील तर प्रवेश दुर्दैवी आहे, असंही धनंजय मुंडे (Dhananjay Munde on Udayanraje) म्हणाले.

भाजपकडून दबावाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोपही धनंजय मुंडेंनी केला. प्रत्येक जण प्रवेश करताना काहीतरी दबावामुळे जातोय. भाजप दबावाचं राजकारण करत आहे. रयत ही राष्ट्रवादीबरोबर कायम राहते. प्रत्येक नेत्याला वाटतं की त्यांनी पक्ष सोडला म्हणजे जनता त्यांच्याबरोबर जाईल. पण असं होत नाही, जनतेला खरं काय ते कळतं. भाजपने अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण सुरु केलंय, असंही ते म्हणाले.

“मनसेबाबत अजून चर्चा नाही”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेत आघाडीसोबत यावं याबद्दल कोणतीही औपचारिक चर्चा अद्याप झालेली नाही, अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली. मात्र राज्यातील सर्व विरोधी पक्ष एकत्र यावेत आणि त्यात राज ठाकरे असावेत असं आघाडीतल्या काही जेष्ठ नेत्यांचं वैयक्तीक मत असल्याचंही ते म्हणाले. मनसेने विधानसभा लढवावी का लोकसभेसारखं परत शांत रहावं हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तीक प्रश्न आहे. कारण आता त्यांच्याही मागे ईडी लागली आहे आणि चौकशी झाल्यानंतर पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, असंही ते म्हणाले.

उदयनराजेंचा भाजप प्रवेश ठरला

उदयनराजे शुक्रवारीच राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे उदयनराजेंचा राजीनामा स्वीकारण्यासाठी दिल्लीत आहेत. उदयनराजे  लोकसभा अध्यक्षांकडे रात्री आठ वाजता राजीनामा सादर करतील. त्यानंतर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत उदयनराजेंचा भाजपप्रवेश होईल. उदयनराजेंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.