AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी दोन भावांच्या कात्रीत सापडलो होतो : उद्धव ठाकरे

एकाने जाहीर सभेत लहान भाऊ म्हटलं, तर दुसऱ्याने मोठा भाऊ बनवलं. मात्र, मी या दोन भावांच्या कात्रीत सापडल्याचं मत मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे (Uddhav Thackeray on Narendra Modi).

मी दोन भावांच्या कात्रीत  सापडलो होतो : उद्धव ठाकरे
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 03, 2020 | 10:07 AM
Share

मुंबई : एकाने जाहीर सभेत लहान भाऊ म्हटलं, तर दुसऱ्याने मोठा भाऊ बनवलं. मात्र, मी या दोन भावांच्या कात्रीत सापडल्याचं मत मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे (Uddhav Thackeray on Narendra Modi). सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभांमध्ये तुम्हाला छोटा भाऊ म्हटलं, तर देवेंद्र फडणवीस तुमचा उल्लेख माझे मोठे भाऊ असाच करत होते. मग काय झालं असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “मी दोन भावांमध्ये मी कात्रीत पकडलो गेलो होतो. शिवसेना ही महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या न्यायहक्कासाठी, मराठी माणसासाठी जन्माला आली. त्यानंतर शिवसेना प्रमुखांना जेव्हा लक्षात आलं की देशात हिंदूंवर गंडांतर येतं आहे तेव्हा शिवसेना प्रमुखांनी हिंदूत्वाचा अंगिकार केला. त्यानंतर शिवसेना आणि भाजपसोबत आले. हिंदुत्वावर एकत्र आलो होतो आणि आमच्या हिंदुत्वात वचन देणं आणि ते पाळणं याला अत्यंत महत्व आहे. ते जर मोडलं जात असेल, तर ते हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही.”

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला, “लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहे हे एक स्पष्ट चित्र होतं. तशी आपण तयारीही केली. त्यानंतर अचानक अमित शाह तुम्हाला भेटायला आले आणि तुम्ही अमित शाहांच्या प्रचंड प्रेमात पडला हे देशानं पाहिलं.” यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “जे करायचं ते दिलखुलास करायचं. चोरुन मारुन करायचं नाही. त्या काळात ते समोरुन आले. मलाही वाटलं आपली वर्षानुवर्षाची युती आहे. पिढी बदलली. त्यामुळे कदाचित थोडं इकडंतिकडं झालं असेल. मात्र, पुन्हा संबंध सुधारत असतील आणि उद्दिष्ट-ध्येय एक असेल तर नवे मार्ग शोधण्यापेक्षा झालं गेलं विसरून नवी सुरुवात करायला हरकत नाही.”

Follow Us
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय....
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर...
लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार, शिंदेंनाही हवय कॅबिनेट
शिंदेंनाही हवंय आणखी एक कॅबिनेट, लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार?
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान