AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नक्कीच पुढचा काळ… राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या विधानाची चर्चा! काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. यानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नक्कीच पुढचा काळ... राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या विधानाची चर्चा! काय म्हणाले?
Uddhav and Raj Thackeray
| Updated on: Jul 27, 2025 | 3:20 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. यानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या भेटीवर पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, ‘भेटीमुळे आनंद द्विगुणीत झाला. नुसता द्विगुणीत नाही. कित्येक पटीने गुणीत झाला आहे. त्यामुळे नक्कीच पुढचा सर्व काळ चांगला होईल. आम्ही अनेक वर्षाने भेटलो. ज्या घरात वाढलो तिथे भेटलो. ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांच्या खोलीत गेलो. आज बऱ्याच वर्षाने राजने घरी येऊन शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषेत द्विगुणीत शब्द आहे. पण त्या पेक्षा कित्येक पटीने हा आनंद मोठा आहे असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

आज राज ठाकरेनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या होत्या. यात राज यांनी ‘माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या असं म्हटलं होतं.

संजय राऊत काय म्हणाले? 

राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मातोश्रीत गेल्यानंतर आत बरंच काही घडलं. दोन भाऊ भेटले. एकमेकांना प्रेमाचं आलिंगन दिलं. गप्पा झाल्या. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत व्यंगचित्रांवर चर्चा झाली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बऱ्याच चर्चा झाल्या, दोन भाऊ भेटले, दोन नेते भेटले नाहीत. दोन भाऊ आहेत. भेटणं गरजेचं आहे. भेटले. आले. नातं दृढ होत आहे. होतंच. आम्हाला त्याचा आनंद आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

संजय राऊत यांना मनसे ठाकरे गटाच्या राजकीय युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सूचक प्रतिक्रिया देताना राऊत यांनी , “जे होईल ते चांगलंच होईल” असे म्हटले आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या भेटीचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......