AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray Interview : पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का? उद्धव ठाकरे म्हणतात, मग माझ्या लढ्याला काय अर्थ!

मुलाखतीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का? असा सवाल केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही का नाही होणार, तो जर करायचा नसेल तर माझ्या लढायला काय अर्थ आहे, असं सांगत आपला इरादा स्पष्ट केला.

Uddhav Thackeray Interview : पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का? उद्धव ठाकरे म्हणतात, मग माझ्या लढ्याला काय अर्थ!
उद्धव ठाकरे यांची मुलाखतImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jul 27, 2022 | 8:54 AM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. शिंदे यांच्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करुन भाजपनं बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं इच्छा पूर्ण केल्याच दावा भाजपनं केला. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील आमदार, भाजपवर जोरदार टीका करण्यात येतेय. याच मुद्द्यावरुन मुलाखतीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का? असा सवाल केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही का नाही होणार, तो जर करायचा नसेल तर माझ्या लढायला काय अर्थ आहे, असं सांगत आपला इरादा स्पष्ट केला.

‘जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम’

संजय राऊत यांनी ठाकरेंना प्रश्न विचारला की, शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल? त्यावर ठाकरे म्हणाले की, का नाही होणार. तो जर करायचा नसेल तर माझ्या लढायला काय अर्थ आहे. माझं जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम आहे. मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे. माझा हेतू नव्हता की मी मुख्यमंत्री होईल. वचन पूर्ण केल्यानंतर सुद्धा मी काय दुकान बंद करून बसणार नाही. शिवसेना मला वाढवायची आहे. ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेल तर मी कशाला पक्षप्रमुख हवा आहे. आज तुम्ही आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याकडे बघत आहात. सगळीकडे प्रचंड गर्दी आहे, सगळीकडे ही चर्चा आहे की यांना धडा शिकवायचा. मी साधारणतः ऑगस्टमध्ये बाहेर पडणार आहे. याचं कारण असं की गेल्या आठवड्यात मी जिल्हाप्रमुखांना काही सूचना दिलेल्या आहेत. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी, तसेच सक्रिय कार्यकर्त्यांशी नोंदणी करा. ती आत्ता चालू आहे. आता जसे आदित्य ठाकरे फिरत आहेत, जेव्हा राज्यामध्ये मी फिरायला लागेल तेव्हा सर्व नेते माझ्यासोबत फिरतील. तेव्हा राज्याचा जो काही एक दौरा होईल त्याच्यामध्ये या लोकांना त्या दौऱ्यात येण्यासाठी ही काम सोडावी लागतील, म्हणून मी तेवढ्यासाठी थांबलो आहे. हे सगळं होऊ द्या त्यानंतर मी बाहेर पडणार. शिवसेनेचा तुफान महाराष्ट्रामध्ये आहे, लोकांच्या मनामध्ये हृदयामध्ये तुफान आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय.

मुंबई महानगरपालिका निवडणुका लवकर जाहीर झाल्या पाहिजेत

अलीकडच्या या सगळ्या राजकारणात तुम्हाला मुंबईचा घात करण्याची योजना दिसते का? असाही प्रश्न संजय राऊतांनी विचारला. त्यावर ठाकरेंनी उत्तर दिलं की, मुंबईचा घात करणे हे त्यांचं जुनं स्वप्न आहे. मागे मी एकदा म्हटलं होतं जसा रावणाचा जीव हा बेंबीत होता, तसं या यांचा जीव मुंबईत आहे, असा विचित्र प्रकार आहे. दिल्ली मिळाली तर यांना मुंबई पाहिजेय. त्या वेळेला जी युती झाली होती त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचे एक वाक्य आहे, तुम्ही ते सांभाळा मी मुंबई सांभाळतो. पण तुम्ही देशात तर आम्हाला पसरू देतच नाही, पण लाल किल्ल्यावरती जाऊन भाषण करण्याची वगैरे तशी आपली इच्छाही नाही. पण निदान महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला जागा देणार नसाल तर अर्थ काय?

मुंबई महानगरपालिका निवडणुका लवकर जाहीर झाल्या पाहिजेत. मुंबईवर पुन्हा भगवा फडकणार. अनेकांनी म्हटलं होतं की या निवडणुकीनंतर शिवसेना राहणार नाही. मात्र मुंबईमध्ये मुंबईकर म्हणून सर्वजण एकत्र झालेले आहेत. तेव्हा यांनी मराठी मराठी, हिंदुत्वामध्ये फोडाफोडीचा प्रयत्न केला होता. ते सुद्धा आता मला येऊन भेटत आहेत. मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न ते आजही करत आहेत. मुंबईकर आज निवडणुकांची वाट बघतोय. त्यामुळे माझं मत आहे लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात. केवळ मुंबईच्या नाहीतर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात, असं आव्हानच ठाकरे यांनी भाजपला दिलंय.

Follow Us
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून...
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून केली पोलखोल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...