AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तपास यंत्रणा सुपारी घेऊन काम करताहेत, त्यांची कार्यालये बंद का करू नये?; उद्धव ठाकरे यांचा खरमरीत सवाल

न्यायदेवतेवर भाष्य करणं गुन्हा आहे. मात्र केंद्रीय कायदा मंत्री त्यावर भाष्य करत आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही? या घटनेची याची दखल न्याय देवता घेईलच, असंही ते म्हणाले.

तपास यंत्रणा सुपारी घेऊन काम करताहेत, त्यांची कार्यालये बंद का करू नये?; उद्धव ठाकरे यांचा खरमरीत सवाल
तपास यंत्रणा सुपारी घेऊन काम करताहेत, त्यांची कार्यालये बंद का करू नये?Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 10, 2022 | 2:15 PM
Share

मुंबई: खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार टीका केली आहे. लोकांचा तपास यंत्रणांवरील विश्वास उडाला आहे. ईडी अशा पद्धतीने काम करत असेल तर ईडी कार्यालय बंद झालं पाहिजे का? असं लोकांनी विचारलं तर, असं सांगतानाच केंद्रीय तपास यंत्रणा या लुटमारीचं काम करत आहेत. या यंत्रणा सुपारी घेऊन काम करत असतील तर या यंत्रणांची कार्यालये बंद का करू नये? असं देशातील जनतेने विचारलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ईडीसह तपास यंत्रणांवर हल्लाबोल केला. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले, अनेक पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. बेकायदेशीर अटक केली जात आहे. खोटे गुन्हे दाखल केले जात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोर्टाचे आभार मानले. कोर्टाने ईडीच्या प्रकरणात काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्याचंही त्यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी तपास यंत्रणांचे वाभाडे काढतानाच या यंत्रणांना पाळीव प्राण्यांची उपमा दिली.

केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्यांप्रमाणे वागत आहे. एखाद्याच्या अंगावर जा म्हटलं तर जात आहे. हे संपूर्ण जग बघत आहे. देश बघत आहे. गेल्या काही दिवसातील उदाहरणे आहेत, अशी टीका त्यांनी केली.

कालचा दणका न्यायालयाने केंद्राला दिल्यावरही कदाचित कुठल्या तरी खोट्या केसेसमध्ये परत संजयला गोवण्याचा प्रयत्न होऊ शकेल. एवढ्या चपराकीनंतर लाज वाटण्यासारखं हे केंद्र सरकार असतं तर अशा घटना घडल्या नसत्या, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

न्याय देवताही आपल्या अंकित करण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय अशी केंद्रीय कायदा मंत्री रिजीजू यांची येत आहेत. सर्व सामान्यांच्या आशेचा किरण न्यायालय असतात. न्यायालय आपल्या बुडाखाली घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

न्यायदेवतेवर भाष्य करणं गुन्हा आहे. मात्र केंद्रीय कायदा मंत्री त्यावर भाष्य करत आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही? या घटनेची याची दखल न्याय देवता घेईलच, असंही ते म्हणाले.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.