AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, दोन पोलीस अॅडमिट

कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. या अपघातात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, दोन पोलीस अॅडमिट
Vishwajeet Kadam convoy accident-
| Edited By: | Updated on: Jul 27, 2021 | 1:52 PM
Share

सांगली : कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. या अपघातात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. मात्र कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम सुखरूप आहेत. विश्वजीत कदम हे सांगली (Sangli flood) जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नागठाणे अंकलखोप इथे पाहणीसाठी जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. अपघातात दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विश्वजीत कदम हे आपल्या मतदारसंघातील अंकलखोप येथे पूर परिस्थितीची पाहणी करत होते. त्यावेळी अचानक गावातील एक इसम त्यांच्या ताफ्याच्या आडवा आला. त्याला वाचविण्यासाठी ताफ्यातील एका गाडीचा ताबा सुटला. ती गाडी रस्त्याच्या पलीकडे जाऊन गाडीचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, गाडी थेट रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली.

मंत्री विश्वजीत कदम सुखरुप 

Vishwajeet kadam

विश्वजीत कदम

या अपघातात ड्रायव्हर आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यास सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान विश्वजीत कदम हे सुखरूप आहेत.

विश्वजीत कदम यांचे दौरे 

दरम्यान, विश्वजीत कदम हे सांगलीतील पूरग्रस्त भागांचे दौरे करत आहेत. नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांनी सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला होता. आज अजित पवारांसह ते मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. या भागातील पूरस्थितीची माहिती ते मुख्यमंत्र्यांना देतील.

सांगली कोल्हापूरची पूरस्थिती आटोक्यात येतीय. आता धोका कमी होतोय. परिस्थिती आटोक्यात येतीय. लोकांना खूप चांगल्या प्रकारे रेस्क्यू करण्यात यश आलं. कोकणवासियांना मोठा फटका बसला. कोकणी बांधवांना आधार देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असं विश्वजीत कदम यांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या 

सांगली जिल्ह्याला पुराचा फटका, पण सुदैवाने 2019 सारखी परिस्थिती नाही, प्रशासनाचं चांगलं काम : विश्वजीत कदम

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.