AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्याकडे मेगाभरती नाही, तर मेरीट भरती होईल : जयंत पाटील

"भाजपमधील 14 ते 15 आमदार आमच्या संपर्कात आहे. मात्र मी त्यांचे नाव फोडणार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होतील," असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी (Jayant Patil Megabharti) केले.

आमच्याकडे मेगाभरती नाही, तर मेरीट भरती होईल : जयंत पाटील
| Updated on: Nov 17, 2019 | 5:35 PM
Share

पुणे : “भाजपमधील 14 ते 15 आमदार आमच्या संपर्कात आहे. मात्र मी त्यांचे नाव फोडणार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होतील,” असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी (Jayant Patil Megabharti) केले. तसेच “आम्ही मेगाभरती करणार नाही. तर आमच्याकडे मेरीटने भरती होईल,” असेही जयंत पाटील (Jayant Patil Megabharti) म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात (Jayant Patil Megabharti) आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. पुण्यातील शरद पवार यांच्या मोदी बागेतील निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले आहे.

याविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक आज बोलवण्यात आली आहे. यात राज्यातील सत्तास्थापनेविषयी यावेळी चर्चा होणार आहे. या बैठकीला राज्यातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र शरद पवार आणि सोनिया गांधी यांची दिल्लीतील बैठक कधी होईल याची मला अद्याप काहीही माहिती नाही. या बैठकीत कोणाला पाठिंबा देण्यापेक्षा एकत्रित सरकार कसे स्थापन होईल याबाबत चर्चा होण्याची शक्यता (Jayant Patil Megabharti) आहे.”

या बैठकीत मसुद्याबाबत चर्चा होणार नाही कारण तो अद्याप फायनल झालेला नाही. दिल्लीत तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसल्यानंतर यावर चर्चा होईल असेही जयंत पाटील म्हणाले.

एनडीएतून शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवण्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहेत. तसेच शिवसेनेच्या बैठकीच्या आसनाची व्यवस्थाही बदललण्यात आली आहे. ते विरोधी बाकावर बसणार आहेत. अशा काही बातम्या मी ऐकल्या आहेत. शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे की नाही याची अधिकृत घोषणा झाली आहे की नाही हे पाहावं लागेल.”

“भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे लवकरच गोड बातमी येईल असे वारंवार सांगत होते. मात्र त्यांची गोड बातमी अद्याप आलेली नाही. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांना कोणत्या गोड बातमीची अपेक्षा आहे याची मला काहीही माहिती नाही.” असेही जयंत पाटील (Jayant Patil Megabharti) म्हणाले.

“मला वाटत राज्यात जनतेच्या मनात असलेलं सरकार आणण्याचे काम शरद पवार करत आहेत. तो प्रयत्न करत असताना महाराष्ट्रात स्थिर सरकार येईल. यासाठी थोडा वेळ लागला तरी चालेल पण महाराष्ट्रात स्थिर सरकार आणण्याचा प्रयत्न होतं आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांना राष्ट्रवादी भाजप बरोबर जाणार का असा प्रश्न उपस्थित केला असता ते म्हणाले, “आम्ही ज्यांच्या विरोधात निवडणूक लढलो. ज्यांना विचाराने आम्ही पराभूत केलं. जे वैचारिक दृष्ट्या भिन्न विचाराचे आहेत. त्यांच्याशी किती जवळ जायचं याला काही मर्यादा असू शकतात. आमच्या पक्षासह राज्यातील जनतेला जे सरकार हवं असले तेच सरकार येईल.”

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.