Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वंचित आघाडीसोबत आमची युती होऊ शकते, पण…मनोज जरांगे पाटील यांचं मोठं विधान काय?

मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांची वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होणार असल्याचे म्हटले जात आहे. वंचितची मनोज जरांगे पाटील यांच्याशी युती होणार का ? याबाबत उत्सुकता लागली आहे.

वंचित आघाडीसोबत आमची युती होऊ शकते, पण...मनोज जरांगे पाटील यांचं मोठं विधान काय?
मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांचा फोटोImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 2:39 PM

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे अखेर महाविकास आघाडीसोबत फाटले आहे. आता वंचित बहुजन विकास आघाडीने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन राज्यात नवीन समीकरणाची बीजे पेरली आहेत. याला कितपत फळ येणार हे येणारा काळच ठरविणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील वंचित आघाडी सोबत आमची युती झाली तर राज्यातील राजकारणाला वेगळी दिशा मिळणार असल्याचे म्हटले आहे. या दोन नेत्यांच्या बैठकीत नेमकी काय बोलणी झाली आहेत. हे अद्याप नीट कळलेले नाही. तरी येत्या काही दिवसात या नव्या युतीबद्दल सत्य बाहेर येईल असे म्हटले जात आहे.

राज्य सरकारने मराठ्यांना 10 टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतरही मनोज जरांगे यांनी आम्ही दहा टक्के आरक्षण मागितलेच नव्हते अशी भूमिका घेत ओबीसीतूनच आरक्षण मिळावे अशी मागणी कायम ठेवली आहे. तसेच सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी असे म्हटले होते. त्यानंतर शेकडो मराठा उमेदवारांना लोकसभा उतरविण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. परंतू नंतर ही योजना मागे पडली. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. आंबेडर साहेबांची आमची भेट झाली, पण आमचा निर्णय 30 तारखेला होणार आहे. त्यानंतर आम्ही निर्णय घेणार असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

30 तारखेला निर्णय घेणार

प्रकाश आंबेडकर यांच्याशी बैठक झाली, साहेबानी विषय सविस्तर मांडला, पण आमचा निर्णय 30 तारखेला होणार. त्यानंतर पुन्हा भेटणार आहोत. अद्याप आम्ही कुणालाही पाठिंबा दिलेला नाही, पाठिंबा आणि उमेदवार आम्ही 30 तारखेला ठरवणार आहोत. मी आधीच कुणाला पाठिंबा देणार नाही, फसवणार नाही. आमची युती होऊ शकते. पण निर्णय 30 तारखेला आम्ही घेणार आहोत असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

खूप मोठ्या उलथापालथ

समाजकारणात एक मत आणि राजकारणात बहुमत, जर आमच्या समाजाचा होकार आला, तर 30 तारखेला खूप मोठ्या उलथापालथ होणार आहेत. आम्ही पाच सहा जाती एकत्र येणार आहोत, मराठा मुस्लिम धनगर आणि दलित बांधव आम्ही एकत्र येणार आहोत. आतापर्यंत माझ्या समाजाची मते आणि जात ग्राह्य धरली जात नव्हती, 70 वर्षात आमच्या जातीला गृहीत धरले नव्हते असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.
तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही? अंबादास दानवे भडकले
तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही? अंबादास दानवे भडकले.
'ओ अनिल परब..आम्हाला हलक्यात घेऊ नका'; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या
'ओ अनिल परब..आम्हाला हलक्यात घेऊ नका'; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या.
सालियन प्रकरणात करूणा शर्माची उडी, 'त्या' प्रकरणाचा उल्लेख करत...
सालियन प्रकरणात करूणा शर्माची उडी, 'त्या' प्रकरणाचा उल्लेख करत....
सालियान प्रकरणात महायुतीचे तीन नेते आदित्य ठाकरेंच्या पाठीशी?
सालियान प्रकरणात महायुतीचे तीन नेते आदित्य ठाकरेंच्या पाठीशी?.
नागपूर हिंसाचाराचं बंगलादेश कनेक्शन? फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा
नागपूर हिंसाचाराचं बंगलादेश कनेक्शन? फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा.
बच्चू कडुंचं उद्यापासून रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन
बच्चू कडुंचं उद्यापासून रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन.
मुलाला वाचवा... ठाकरेंचा फोन होता, नितेश राणेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
मुलाला वाचवा... ठाकरेंचा फोन होता, नितेश राणेंचा खळबळजनक गौप्यस्फोट.
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, 'आता जे होईल ते...'
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, 'आता जे होईल ते...'.