AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भावनिक होण्याने सरकारला फरक पडत नाही, बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांना काय सल्ला दिला

सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कठीबद्ध असल्याचे वारंवार म्हटले आहे. तरीही मराठा समाजाने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला आमच्या शुभेच्छा आहेत असे ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना भावनिक साद घातल्याने सरकारवर काही परिणाम होईल असे वाटत नाही असेही तायवाडे यांनी म्हटले आहे.

भावनिक होण्याने सरकारला फरक पडत नाही, बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांना काय सल्ला दिला
BABANRAO TAYWADE
| Updated on: Jan 20, 2024 | 1:24 PM
Share

सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर | 20 जानेवारी 2024 : मराठ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या आंदोलनाला आमच्या शुभेच्छा आहेत. मराठ्यांना आरक्षण देण्यास सरकार कठीबद्ध असल्याचे सांगत आहे. मराठ्यांना आज ना उद्या आरक्षण मिळणारच आहे. तरी मराठे आग्रही भूमिका घेत आहेत. त्यांनी टोकाची भूमिका घेण्याबद्दल पुनर्विचार करावा असा सल्ला ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे. मराठ्यांना भावनिक साद घालण्याने सरकारला काही फरक पडत नाही. सरकारला अशा आंदोलनांना हाताळण्याचा अनुभव असतो. भावनिकतेचा सरकारवर काही परिणाम होणार नसल्याचेही तायवाडे यांनी म्हटले आहे.

मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबई असा नारा देत आजपासून ( 20 जानेवारी ) मुंबईकडे कूच केले आहे. लाखो मराठे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला शुभेच्छा दिल्या आहेत. परंतू जरांगे यांना सरकारने आश्वासन दिले आहे. मराठ्यांना आज ना उद्या आरक्षण मिळणारच आहे. त्यांनी याच तारखेला झालं पाहीजे त्याच तारखेला झाले पाहीजे असा आग्रह धरु नये. सरकारला निर्णय घ्यायला वेळ लागतो. जर सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यास कठीबद्ध आहे असं वारंवार सांगत आहे तर मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाचा फेरविचार करावा असेही बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे.

कुणबी नोंदी सापडले त्यांना प्रमाणपत्र देण्यात कुठली हरकत नाही. मात्र प्रमाणपत्र देण्याकरिता राज्य सरकारला जी प्रक्रिया पूर्ण करावी लागते ती प्रक्रिया सरकार पूर्ण करत आहे. सरकारने राजपत्र निर्गमित करून आधी दोनच कागदपत्र ग्राह्य धरली जात होती, त्यात आता वाढ केली आहे. 11- 12 प्रकारचे दस्तावेज ग्राह्य धरण्याचे ठरवले. ते कागदपत्र ग्राह्य धरण्यासाठी राजपत्र काढावे लागते. अधिकाऱ्यांना अधिकृतरित्या राजपत्र मिळत नाहीत. तोपर्यंत ते कागदपत्र ग्राह्य धरू शकत नाहीत. मात्र आंदोलनकर्त्यांची तात्काळ गावातल्या गावात कागदपत्र द्यावीत अशी मागणी आहे. हे होऊ शकत नाही याचा आंदोलनकर्त्यांनी अभ्यास करायला पाहिजे असे बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको

आमची भूमिका स्पष्ट आहे की मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे, मात्र ते ओबीसीतून देऊ नये. ओबीसीतून सरसकट प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत असे ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. शंका कुशंका निर्माण करणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. दुसऱ्यांवर शंका निर्माण करणे, भावनिक होणे, याचा सरकारला काही फरक पडत नाही. हे आम्ही आतापर्यंत पाहिलेले आहे. सरकार वेगवेगळे आंदोलन हॅण्डल करीत असतात. त्यामुळे आपण भावनिक होऊन समाजाला भावनिक करणे यातून काहीही निष्पन्न होत नाही असेही तायवाडे यांनी म्हटले आहे.

Follow Us
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
Video | पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता...
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत
सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
Parbhani | सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! परभणीत वादळी पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं प्रकरण काय?
महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर ठोंबरेंचा घणाघात
Rupali Chakankar | महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरेंचा घणाघात!