AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP : गृह, अर्थ तर ठेवलेच पण जलसंपदा आणि ऊर्जासारखी महत्त्वाची खातीही फडणवीसांकडे, काय आहे या खात्यांचं महत्त्व?, काय आहेत कारणं?

युती सरकारच्या काळातही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तरी, जलसंधारणाच्या कामावर त्यांचे विशेष लक्ष होते. शिवाय या खात्याच्या माध्यमातून पायाभूत विकास आणि थेट जनतेशी संलग्न कामे मार्गी लागतात. थेट ग्राउंड स्थरावर उतरुन काम करता येणारे खाते म्हणजे जलसंधारण. 2015 साली देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आले होते. पाण्याची पातळी वाढवून आवर्षणाच्या ठिकाणी शेतकऱ्यांचा कायमचा प्रस्न मार्गी लावण्याचा त्यांचा निर्धार होता.

BJP : गृह, अर्थ तर ठेवलेच पण जलसंपदा आणि ऊर्जासारखी महत्त्वाची खातीही फडणवीसांकडे, काय आहे या खात्यांचं महत्त्व?, काय आहेत कारणं?
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Google
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Aug 14, 2022 | 7:20 PM
Share

मुंबई : अखेर दिलेल्या शब्दानुसार (Eknath Shinde) शिंदे सरकारने 15 ऑगस्टपूर्वीच खाते वाटपही केले आहे. विरोधकांकडून होत असलेली टीका आणि राज्यातील कारभार सुरळीत व्हावा या अनुशंगाने हा निर्णय शिंदे सरकारने घेतला असला तरी (Account Allocation) खातेवाटपात भाजपालाच ढळते माप मिळाले आहे. यातच उपमुख्यमंत्री असलेले (Devandra Fadnvis) देवेंद्र फडणवीसच खऱ्या अर्थाने राज्याचा कारभार हाकणार का असा सवाल त्यांच्याकडील खाती पाहिल्यानंतर मनात येणारच आहे. त्यांच्याकडे अर्थ आणि गृह खातं हे निश्चित मानले जात होते पण या दोन महत्वाच्या खात्याबरोबर जलसंपदा आणि उर्जा यासारखी महत्वाची खातीही त्यांनी स्वत:कडेच ठेवली आहेत. त्यामुळे शहरी बरोबर ग्रामीण जनतेशी संलग्न असलेली खाते फडणवीसांकडेच राहणार आहेत. शिवाय जलसंपदा खात्याच्या माध्यमातून गतवेळी अधुरे राहिलेले त्यांचे स्वप्न पूर्ण होणार का हे देखील पहावे लागणार आहे.

जलसंधारणाच्या कामावर भर

युती सरकारच्या काळातही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तरी, जलसंधारणाच्या कामावर त्यांचे विशेष लक्ष होते. शिवाय या खात्याच्या माध्यमातून पायाभूत विकास आणि थेट जनतेशी संलग्न कामे मार्गी लागतात. थेट ग्राउंड स्थरावर उतरुन काम करता येणारे खाते म्हणजे जलसंधारण. 2015 साली देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आले होते. पाण्याची पातळी वाढवून आवर्षणाच्या ठिकाणी शेतकऱ्यांचा कायमचा प्रस्न मार्गी लावण्याचा त्यांचा निर्धार होता. शिवाय तशी कामेही राज्यात झाली होती. मात्र, महाविकास आघाडी काळात या महत्वाच्या योजनेवर आक्षेप घेत देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे ही योजना कशी यशस्वी होती आणि विरोधकांना दाखवून देण्यासाठी फडणवीसांनी हे खातेच आता आपल्याकडे घेतले आहे. त्यामुळे राजकारणाबरोबर जलसंधारण होणेही तेवढेच गरजेचे आहे.

उर्जा खात्यातून जनतेची सेवा

ज्या खात्याच्या माध्यमातून थेट जनतेचे प्रश्न सोडवले जातील अशी खाती देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवली आहे. जलसंधारण पाठोपाठ ऊर्जा खात्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न तर मार्गी लावता येतात पण गेल्या काही दिवसांपासून ह्या खाते अडचणीत आहे. मध्यंतरी तरी महावितरणचे खासगीकरण होणार इथपर्यंत झाले होते. मात्र, अशा खात्यालाच उभारी देण्याचा प्रय़त्न हा फडणवीसांचा असणार आहे. विजेचा वाढता वापर आणि त्यापेक्षा कैक पटीने वाढती थकबाकी यासारखी आव्हाने असली तरी थेट जनतेशी संबंधित खात्यावर फडणवीसांचा भर राहिलेला आहे.

महत्वाची खाती फडणवीसांकडेच

खाते वाटपात भाजपच सरशी ठरणार हे निश्चित असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह, अर्थ याबरोबर विधी आणि न्याय, जलसंपदा, गृहनिर्माण, उर्जा आणि राजशिष्ठाचार ही खातीही फडणवीस यांच्याकडेच असणार आहेत. यापूर्वीही त्यांनी गृह आणि अर्थ खाते त्यांच्याकडेच होते पण यामध्ये आणखी भर आणि तेही महत्वाच्या खात्याची पडल्याने जनतेशी थेट संपर्क राहिल अशी खाती त्यांच्याकडे आहेत. भविष्याचा वेध घेत त्यांनी ही खाते घेतली असल्याचेही नाकरता येत नाही.

Follow Us
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?