Bihar Election | बिहारचं राजकारण, संख्याबळ ते सत्ताकारण, कोण किती वरचढ?

बिहारमध्ये सध्या एकूण 7 कोटी 29 लाख मतदार आहेत. २०१५ मध्ये ही मतदारसंख्या 6. 68 कोटी एवढी होती. म्हणजे यंदा जवळपास 68 लाख नव्या मतदारांची भर बिहारमध्ये पडली आहे. त्यामुळे हा नवमतदार कुणाच्या पारड्यात मतदान टाकणार? हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

Bihar Election | बिहारचं राजकारण, संख्याबळ ते सत्ताकारण, कोण किती वरचढ?
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 1:43 PM

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगूल आजपासून वाजणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांचं तुरुंगात असणं, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या लोकप्रियतेला लागलेली आहोटी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढता करिष्मा, काँग्रेसकडे नेतृत्वाची असलेली वाणवा आणि देशभरात कोरोना संसर्गाचा निर्माण झालेला कहर या पार्श्वभूमीवर यंदाची बिहार विधानसभा निवडणूक होत असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत पुन्हा नितीश कुमार यांची सरशी होणार की लालू प्रसाद यादव तुरुंगातूनही आपला करिष्मा कायम राखणार? हे येणारा काळच ठरवणार आहे.(Bihar Assembly Election Results 2015 )

बिहार विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपत आहे. राज्यात एकूण २४३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यात 243 पैकी 38 जागा अनुसूचित जातीसाठी आणि 2 जागा अनुसूचित जनजातीसाठी राखीव आहेत. बिहारमध्ये सध्या एकूण 7 कोटी 29 लाख मतदार आहेत. २०१५ मध्ये ही मतदारसंख्या 6. 68 कोटी एवढी होती. म्हणजे यंदा जवळपास 68 लाख नव्या मतदारांची भर बिहारमध्ये पडली आहे. त्यामुळे हा नवमतदार कुणाच्या पारड्यात मतदान टाकणार? हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. हा नवमतदार बिहारच्या निवडणुकीचं गणित बदलू शकणार नसला तरी त्याचा या निवडणुकीवर नक्कीच प्रभाव जाणवेल असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

लालू-नितीश साथ-साथ

२०१५मध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी महाआघाडीची निर्माण केली होती. या आघाडीत नितीशकुमार यांचा जेडीयू आणि काँग्रेसचाही समावेश होता. तर भाजपने आरएलएसपी आणि रामविलास पासवान यांच्या लोजपाशी युती करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी नितीशकुमार हे महाआघाडीचा निवडणुकीतील महत्त्वाचा चेहरा असले तरी लालूप्रसाद यादव हेच खरे स्टार प्रचारक होते. मात्र, दोन वर्षांतच नितीशकुमार यांनी लालूंच्या महाआघाडीशी फारकत घेऊन भाजपशी हात मिळवणी करून सत्ता स्थापन केली होती.

लालूंच्या जागा सर्वाधिक तरीही नितीशकुमार मुख्यमंत्री

2015मध्ये महाआघाडीला 243 जागांपैकी 178 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजप आघाडीला अवघ्या 58 जागांवरच समाधान मानावे लागले होते. इतर आणि अपक्षांना एकूण 7 जागा मिळाल्या होत्या. महाआघाडीत आरजेडीला 80, जेडीयूला 71 आणि काँग्रेसला 26 जागा मिळाल्या होत्या. महाआघाडीतून निवडणूक लढल्यामुळे गेल्या 25 वर्षांत काँग्रेसला पहिल्यांदाच चांगलं यश मिळालं होतं. तर, भाजप आघाडीत भाजपला 53 जागा मिळाल्या होत्या. तर लोजपाला 2, आरएलएसपीला 2 आणि एचआयएमला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. (Bihar Assembly Election Results 2015 )

या निवडणुकीत लालूप्रसाद यादव हेच किंग मेकर ठरले होते. सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर राजदचा मुख्यमंत्री होण्याची पूर्ण शक्यता असतानाही लालूंनी सर्वच राजकीय निरीक्षकांना धक्का देत नितीशकुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली होती. लालूंचा हा निर्णय अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला होता. दरम्यान, दोन वर्षानंतर नितीशकुमार यांनी राजदशी असलेला घरोबा तोडत थेट भाजपशी हात मिळवणी करत सवतासुभा रचला होता.

अशी झाली 2015ची निवडणूक

2015मध्ये बिहार विधानसभा निवडणूक 12 ऑक्टोबरला सुरू होऊन 5 नोव्हेंबरपर्यंत चालली होती. 8 नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर झाले होते. निवडणूक आयोगाने पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या होत्या. 2015मध्ये राज्यात 6.68 मतदार होते. त्यावेळी 56 टक्के मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला होता.

बिहारचे राजकीय बलाबल

  • एनडीए : 125
  • राजद : 80
  • काँग्रेस : 26
  • सीपीआय : 3
  • एचएएम : 1
  • एमआयएम : 1
  • अपक्ष : 5
  • खाली : 2
  • (एकूण जागा 243 सीट)

संबंधित बातम्या:  

बिहार पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, राजकारणाच्या वाटेवर? 

बिहार निवडणुकीचा सुशांतसिंह प्रकरणाशी घेणं-देणं नाही – देवेंद्र फडणवीस    

बिहार निवडणुकीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

(Bihar Assembly Election Results 2015 )

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.